म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
लॉकडाउनमध्ये विनाकारण घराबाहेर पडून नियमभंग करणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना बुधवारी अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या समितीने केलेल्या चौकशीनंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात मारहाण करून जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप या पोलिसांवर असून, चौघांना न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात राजू देवेंद्र हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. लॉकडाउन कालावधीत तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी जात असताना पोलिसांनी अडवले. योग्य कारण न सांगता आल्याने त्याला कारवाईसाठी जुहू पोलिस ठाण्यात नेले. असे असताना सकाळी सहाच्या सुमारास येथूनच जवळ राजू बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला कूपर रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात हल्लेखोराने किंवा जमावाने केलेल्या मारहाणीत राजूचा मृत्यू झाला असावा, अशा प्रकारचा गुन्हा जुहू पोलिसांनी दाखल केला. मात्र पोलिसांची माहिती खोटी असून रात्रभर पोलिस ठाण्यात केलेल्या मारहाणीत राजू याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या भावाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले होते.
सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याप्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली. प्राथमिक चौकशीत याप्रकरणात आरोपी असलेल्या कान्स्टेबल संतोष देसाई, आनंदा गायकवाड, दिगंबर चव्हाण, अंकुश पालवे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे नमूद करीत या चौघांना ऑगस्टमध्ये पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. पुढील चौकशीमध्ये आरोपी पोलिसांविरुद्ध सीसीटीव्ही फुटेज, तसेच आणखी काही पुरावे हाती लागल्याने बुधवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
लॉकडाउनमध्ये विनाकारण घराबाहेर पडून नियमभंग करणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना बुधवारी अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या समितीने केलेल्या चौकशीनंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात मारहाण करून जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप या पोलिसांवर असून, चौघांना न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात राजू देवेंद्र हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. लॉकडाउन कालावधीत तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी जात असताना पोलिसांनी अडवले. योग्य कारण न सांगता आल्याने त्याला कारवाईसाठी जुहू पोलिस ठाण्यात नेले. असे असताना सकाळी सहाच्या सुमारास येथूनच जवळ राजू बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला कूपर रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात हल्लेखोराने किंवा जमावाने केलेल्या मारहाणीत राजूचा मृत्यू झाला असावा, अशा प्रकारचा गुन्हा जुहू पोलिसांनी दाखल केला. मात्र पोलिसांची माहिती खोटी असून रात्रभर पोलिस ठाण्यात केलेल्या मारहाणीत राजू याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या भावाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले होते.
सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याप्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली. प्राथमिक चौकशीत याप्रकरणात आरोपी असलेल्या कान्स्टेबल संतोष देसाई, आनंदा गायकवाड, दिगंबर चव्हाण, अंकुश पालवे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे नमूद करीत या चौघांना ऑगस्टमध्ये पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. पुढील चौकशीमध्ये आरोपी पोलिसांविरुद्ध सीसीटीव्ही फुटेज, तसेच आणखी काही पुरावे हाती लागल्याने बुधवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.