अहमद अली । टाइम्स वृत्त, मुंबई
रिक्षाचालकाशी अवघ्या दोन रुपयांवरून झालेला वाद २६ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची विचित्र घटना विक्रोळीतील गोदरेज कॉलनीत घडली आहे. चेतन अर्चिर्णेकर असं या तरुणाचं नाव असून शिवी देऊन पळणाऱ्या रिक्षावाल्याचा पाठलाग करत असताना रिक्षा अंगावर उलटल्याने त्याचा मृत्यू झाला.
बीबीए ग्रॅज्युएट झालेला चेतन नुकताच एका अकाउंट कंपनीत नोकरीला लागला होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्याहूनही दुर्दैव म्हणजे, हा सगळा प्रकार चेतनचे वडील गणपत अर्चिर्णेकर यांच्या डोळ्यांदेखतच घडला, पण ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत.
रविवारी सकाळी चेतन गोव्याला गेला होता. तिथे काही तास थांबून लगेचच रात्री ११च्या विमानाने तो मुंबईत परतला. विमानप्रवासाचं त्याला प्रचंड कुतूहल होतं आणि तो पहिल्यांदाच विमानाने आला होता. सव्वाच्या सुमारास त्याने दार वाजवलं आणि माझ्याकडे २०० रुपये मागितले. त्याच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने रिक्षावाला खाली थांबला होता. तो पैसे देऊन लगेच येईल, असं आम्हाला वाटलं. पण पाच मिनिटं होऊन गेल्यावरही तो न आल्यानं मी खाली उतरलो. तेव्हा, त्याचा रिक्षावाल्याशी वाद सुरू होता. हा वाद जीवावर बेतेल अशी पुसटशीही कल्पना तेव्हा नव्हती, असं सांगताना गणपत अर्चिर्णेकर हळवे झाले होते.
रिक्षाचं भाडं १७२ रुपये झालं होतं. चेतनने रिक्षावाल्याला २०० रुपये दिले. पण, रिक्षावाल्याने २८ ऐवजी २० रुपयेच त्याच्या हातावर टेकवले होते. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. दोन रुपये सुट्टे दे आणि ३० रुपये घे, नाहीतरी आठ रुपये विसर, असा रिक्षावाल्याचा तोरा होता. शेवटी, वडिलांच्या मध्यस्थीनंतर चेतन २० रुपये घेऊन मागे फिरला होता. पण इतक्यातच रिक्षावाला काहीतरी पुटपुटला आणि शिवी देऊन निघाला. तिथे चेतनचा राग अनावर झाला. त्याने रिक्षावाल्याचा पाठलाग सुरू केला आणि थोड्याच अंतरावर त्यानं रिक्षाला गाठलं. रिक्षाचा पोल हातात धरून तो धावत असतानाच रिक्षा उलटली आणि चेतन रिक्षाखाली दबला गेला.
हा सगळा प्रकार पाहून चेतनचे बाबा त्याच्याकडे धावले, पण ते येत असल्याचं पाहून घाबरलेला रिक्षावाला पसार झाला. अखेर, काही शेजाऱ्यांना बोलावून गणपत यांनी चेतनला गोदरेज हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
या दरम्यान, रिक्षावाला कमलेश मिश्रा विक्रोळी पोलीस स्टेशनात पोहोचला होता. आपल्याला मारहाण केल्याची तक्रार त्यानं दाखल केली होती. परंतु, नेमका काय प्रकार घडलाय, हे पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कमलेश मिश्राला अटक केली आहे. त्याच्यावर आयपीसीच्या कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय.
रिक्षाचालकाशी अवघ्या दोन रुपयांवरून झालेला वाद २६ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची विचित्र घटना विक्रोळीतील गोदरेज कॉलनीत घडली आहे. चेतन अर्चिर्णेकर असं या तरुणाचं नाव असून शिवी देऊन पळणाऱ्या रिक्षावाल्याचा पाठलाग करत असताना रिक्षा अंगावर उलटल्याने त्याचा मृत्यू झाला.
बीबीए ग्रॅज्युएट झालेला चेतन नुकताच एका अकाउंट कंपनीत नोकरीला लागला होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्याहूनही दुर्दैव म्हणजे, हा सगळा प्रकार चेतनचे वडील गणपत अर्चिर्णेकर यांच्या डोळ्यांदेखतच घडला, पण ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत.
रविवारी सकाळी चेतन गोव्याला गेला होता. तिथे काही तास थांबून लगेचच रात्री ११च्या विमानाने तो मुंबईत परतला. विमानप्रवासाचं त्याला प्रचंड कुतूहल होतं आणि तो पहिल्यांदाच विमानाने आला होता. सव्वाच्या सुमारास त्याने दार वाजवलं आणि माझ्याकडे २०० रुपये मागितले. त्याच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने रिक्षावाला खाली थांबला होता. तो पैसे देऊन लगेच येईल, असं आम्हाला वाटलं. पण पाच मिनिटं होऊन गेल्यावरही तो न आल्यानं मी खाली उतरलो. तेव्हा, त्याचा रिक्षावाल्याशी वाद सुरू होता. हा वाद जीवावर बेतेल अशी पुसटशीही कल्पना तेव्हा नव्हती, असं सांगताना गणपत अर्चिर्णेकर हळवे झाले होते.
रिक्षाचं भाडं १७२ रुपये झालं होतं. चेतनने रिक्षावाल्याला २०० रुपये दिले. पण, रिक्षावाल्याने २८ ऐवजी २० रुपयेच त्याच्या हातावर टेकवले होते. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. दोन रुपये सुट्टे दे आणि ३० रुपये घे, नाहीतरी आठ रुपये विसर, असा रिक्षावाल्याचा तोरा होता. शेवटी, वडिलांच्या मध्यस्थीनंतर चेतन २० रुपये घेऊन मागे फिरला होता. पण इतक्यातच रिक्षावाला काहीतरी पुटपुटला आणि शिवी देऊन निघाला. तिथे चेतनचा राग अनावर झाला. त्याने रिक्षावाल्याचा पाठलाग सुरू केला आणि थोड्याच अंतरावर त्यानं रिक्षाला गाठलं. रिक्षाचा पोल हातात धरून तो धावत असतानाच रिक्षा उलटली आणि चेतन रिक्षाखाली दबला गेला.
हा सगळा प्रकार पाहून चेतनचे बाबा त्याच्याकडे धावले, पण ते येत असल्याचं पाहून घाबरलेला रिक्षावाला पसार झाला. अखेर, काही शेजाऱ्यांना बोलावून गणपत यांनी चेतनला गोदरेज हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
या दरम्यान, रिक्षावाला कमलेश मिश्रा विक्रोळी पोलीस स्टेशनात पोहोचला होता. आपल्याला मारहाण केल्याची तक्रार त्यानं दाखल केली होती. परंतु, नेमका काय प्रकार घडलाय, हे पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कमलेश मिश्राला अटक केली आहे. त्याच्यावर आयपीसीच्या कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय.