अ‍ॅपशहर

झाकीर नाईक यांनी 'भारत वापसी' टाळली!

दहशतवादाला चिथावणी दिल्याच्या आरोपांमुळं राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेले वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक व इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांनी 'भारत वापसी' टाळली आहे. नाईक यांची आज होणारी पूर्वनियोजित पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे.

Maharashtra Times 11 Jul 2016, 3:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zakir naik cancells mumbai press conference
झाकीर नाईक यांनी 'भारत वापसी' टाळली!


दहशतवादाला चिथावणी दिल्याच्या आरोपांमुळं राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेले वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक व इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांनी 'भारत वापसी' टाळली आहे. नाईक यांची आज होणारी पूर्वनियोजित पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे.

बांगलादेशची राजधानी ढाका येथील हॉटेलवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी झाकीर नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे समोर आलं आहे. तेव्हापासून नाईक हे भारतीय तपास यंत्रणाच्या रडारवर आहेत. भारतातील अनेक राजकीय पक्ष तसंच, संघटनांनी झाकीर यांच्या भाषणांवर व त्यांच्या मालकीच्या 'पीस' टीव्हीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनंही या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला असून नाईक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं नाईक यांच्या चौकशीसाठी विशेष पोलीस पथक स्थापन केलं आहे. नाईक देशात परतताच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी भारतात येणं टाळल्याचं बोललं जात आहे.

झाकीर नाईक सध्या सौदी अरेबियात आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते आज भारतात परतणार होते. दहशतवादाचे सर्व आरोप फेटाळणारे नाईक आज पत्रकार परिषदही घेणार होते. मात्र, ते आज परतलेच नाहीत. कारवाईच्या भीतीमुळंच त्यांनी हे केल्याची चर्चा आहे. झाकीर नाईक कधी परतणार याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून काही सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी झाकीर यांचे घर व कार्यालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज