म. टा. प्रतिनिधी
चर्चगेट - मुंबई लोकल ट्रेनमधील निम्मी गर्दी कमी झालेली असल्याने त्याचे सकारात्मक परिणामही दिसण्यास सुरुवात झाली आहे. धावत्या लोकलमधून पडणे, लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पकड सुटून होणारा अपघात अशा कारणामुळे रेल्वे प्रवाशांचा हकनाक जीव जात होता. पण, आता कमी गर्दीमुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
वाढते इंधन दर, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे स्वस्त आणि वेगवान प्रवासासाठी मुंबई-उपनगरातील प्रवासी मुंबई लोकलवरच अवलंबून आहे. चर्चगेट ते विरार हे अंतर बसने पूर्ण करण्यासाठी साधारणपणे १०० रुपये भाडे घेण्यात येते. तसेच या प्रवासासाठी तीन ते चार तास लागतात. लोकलमुळे अवघ्या २० रुपयांच्या तिकिटात तास-दीड तासात प्रवास पूर्ण होतो. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्याला प्रवाशांची पसंती आहे.
मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, सर्वांसाठी मर्यादित वेळेत लोकल मुभा मिळाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात अर्थात १ ते ७ फेब्रुवारी या काळात मध्यसह हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर एकूण ४ मृत्यू आणि ६ प्रवासी जखमी झाले. पश्चिम रेल्वेवरील लोकल स्थानकांत मुंबई सेंट्रल स्थानकातील एक जखमी वगळल्यास उर्वरित सर्व स्थानकांवर एकाही प्रवाशाचा मृत्यू किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. करोना पूर्व काळात लोकल अपघातात रोज ८-१० प्रवाशांचा मृत्यू आणि ८-१० प्रवासी जखमी होत होते.
मुंबई लोकलमधील गर्दी आटोक्यात आणल्यानंतर रेल्वे अपघातात कशी घट होते, हे आता सप्रमाण सिद्ध झाले आहे.
वेळेच्या बंधनासह सुरू झालेल्या प्रवासात नोकरदार वर्ग रेल्वेकडे फिरकलेला नाही. नियंत्रित प्रवासी संख्येमुळे रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वय साधत स्थानकातच प्रवाशांना शिस्तीचे धडे देण्यात येत आहेत.
कामाच्या वेळा-सुट्ट्यांमध्ये बदल
गर्दी विभागण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळांत बदल करावा, सुट्टीचे दिवस बदलण्यात यावेत, सरकारी-खासगी कार्यालयातील जागा बदलण्यात याव्या, जेणेकरून एकाच दिशेला जाणाऱ्या गर्दीचा प्रवास रोखता येईल. यामुळे भविष्यात ही शून्य मृत्यू ही नोंद कायम ठेवणे शक्य होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
............
चर्चगेट - मुंबई लोकल ट्रेनमधील निम्मी गर्दी कमी झालेली असल्याने त्याचे सकारात्मक परिणामही दिसण्यास सुरुवात झाली आहे. धावत्या लोकलमधून पडणे, लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पकड सुटून होणारा अपघात अशा कारणामुळे रेल्वे प्रवाशांचा हकनाक जीव जात होता. पण, आता कमी गर्दीमुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
वाढते इंधन दर, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे स्वस्त आणि वेगवान प्रवासासाठी मुंबई-उपनगरातील प्रवासी मुंबई लोकलवरच अवलंबून आहे. चर्चगेट ते विरार हे अंतर बसने पूर्ण करण्यासाठी साधारणपणे १०० रुपये भाडे घेण्यात येते. तसेच या प्रवासासाठी तीन ते चार तास लागतात. लोकलमुळे अवघ्या २० रुपयांच्या तिकिटात तास-दीड तासात प्रवास पूर्ण होतो. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्याला प्रवाशांची पसंती आहे.
मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, सर्वांसाठी मर्यादित वेळेत लोकल मुभा मिळाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात अर्थात १ ते ७ फेब्रुवारी या काळात मध्यसह हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर एकूण ४ मृत्यू आणि ६ प्रवासी जखमी झाले. पश्चिम रेल्वेवरील लोकल स्थानकांत मुंबई सेंट्रल स्थानकातील एक जखमी वगळल्यास उर्वरित सर्व स्थानकांवर एकाही प्रवाशाचा मृत्यू किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. करोना पूर्व काळात लोकल अपघातात रोज ८-१० प्रवाशांचा मृत्यू आणि ८-१० प्रवासी जखमी होत होते.
मुंबई लोकलमधील गर्दी आटोक्यात आणल्यानंतर रेल्वे अपघातात कशी घट होते, हे आता सप्रमाण सिद्ध झाले आहे.
वेळेच्या बंधनासह सुरू झालेल्या प्रवासात नोकरदार वर्ग रेल्वेकडे फिरकलेला नाही. नियंत्रित प्रवासी संख्येमुळे रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वय साधत स्थानकातच प्रवाशांना शिस्तीचे धडे देण्यात येत आहेत.
कामाच्या वेळा-सुट्ट्यांमध्ये बदल
गर्दी विभागण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळांत बदल करावा, सुट्टीचे दिवस बदलण्यात यावेत, सरकारी-खासगी कार्यालयातील जागा बदलण्यात याव्या, जेणेकरून एकाच दिशेला जाणाऱ्या गर्दीचा प्रवास रोखता येईल. यामुळे भविष्यात ही शून्य मृत्यू ही नोंद कायम ठेवणे शक्य होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
............