काँग्रेस नेत्यांचे दिल्लीश्वरांना साकडे
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवताच शहर काँग्रेसचा मोठा गट अचानक सक्रिय झाला. प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार द्यावा आणि नाव निश्चित करण्यापूर्वी शहर काँग्रेसला विश्वासात घ्यावे, उमेदवार लादू नयेत, या मागणीसाठी तब्बल ९० नेते व पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत नेत्यांना साकडे घातले. तथापि, ही मोर्चेबांधणी करताना स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले आहे.
काँग्रेसने दिलेल्या कार्यक्रमानुसार, शहर व जिल्हा समितीकडून प्रदेश काँग्रेसकडे अर्ज पाठवायचे आहेत. यानंतर प्रदेश पातळीवर छाननी करून केंद्रीय समितीकडे इच्छुकांच्या नावाची शिफारस करण्यात येईल. या प्रक्रियेवर राहुल गांधी यांनी भर दिला आहे. असे असतानाही स्थानिक नेत्यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली. शहरातील सहाही मतदारसंघातील पदाधिकारी व अन्य नेत्यांचा यात समावेश आहे. यातील बहुतांश नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार समर्थक मानले जातात.
शहराध्यक्ष विकास ठाकरे, डॉ. बबनराव तायवाडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी आदी ९० पदाधिकारी व नेते तीन वेगवेगळ्या विमानांनी दिल्लीला रवाना झाले. या नेत्यांनी लोकसभेतील पक्षनेते व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांची सोमवारी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नितीन गडकरी यांचे शहर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या उपराजधानीत गेल्या साडेचार वर्षांत केलेली आंदोलने, केंद्रीय समिती व प्रदेशकडून आलेल्या कार्यक्रमांची अंमबजावणींची माहिती नेत्यांना देण्यात आली. मुकुल वासनिक, अहमद पटेल यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेण्यात येणार आहे. दिल्लीत कुणाचीही तक्रार करण्यासाठी आलेलो नाही, असा दावा दिल्लीला गेलेल्या एका नेत्याने केला.
-तर पक्ष संकटात येईल!
भाजपचे संभाव्य उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. त्यांचे वजन लक्षात घेऊन नागपूरमध्ये वरून उमेदवार लादल्यास किंवा तुल्यबळ न दिल्यास त्याचे परिणाम लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होतील. इतकेच नाही तर, त्यानंतर अडीच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीतही पक्ष संकटात येईल. शहर काँग्रेस समितीकडे अर्ज केलेल्या इच्छुकांचाच विचार करण्यात यावा. पक्षाला बळकट करणाऱ्या शहर काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंतीही नेत्यांना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवताच शहर काँग्रेसचा मोठा गट अचानक सक्रिय झाला. प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार द्यावा आणि नाव निश्चित करण्यापूर्वी शहर काँग्रेसला विश्वासात घ्यावे, उमेदवार लादू नयेत, या मागणीसाठी तब्बल ९० नेते व पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत नेत्यांना साकडे घातले. तथापि, ही मोर्चेबांधणी करताना स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले आहे.
काँग्रेसने दिलेल्या कार्यक्रमानुसार, शहर व जिल्हा समितीकडून प्रदेश काँग्रेसकडे अर्ज पाठवायचे आहेत. यानंतर प्रदेश पातळीवर छाननी करून केंद्रीय समितीकडे इच्छुकांच्या नावाची शिफारस करण्यात येईल. या प्रक्रियेवर राहुल गांधी यांनी भर दिला आहे. असे असतानाही स्थानिक नेत्यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली. शहरातील सहाही मतदारसंघातील पदाधिकारी व अन्य नेत्यांचा यात समावेश आहे. यातील बहुतांश नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार समर्थक मानले जातात.
शहराध्यक्ष विकास ठाकरे, डॉ. बबनराव तायवाडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी आदी ९० पदाधिकारी व नेते तीन वेगवेगळ्या विमानांनी दिल्लीला रवाना झाले. या नेत्यांनी लोकसभेतील पक्षनेते व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांची सोमवारी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नितीन गडकरी यांचे शहर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या उपराजधानीत गेल्या साडेचार वर्षांत केलेली आंदोलने, केंद्रीय समिती व प्रदेशकडून आलेल्या कार्यक्रमांची अंमबजावणींची माहिती नेत्यांना देण्यात आली. मुकुल वासनिक, अहमद पटेल यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेण्यात येणार आहे. दिल्लीत कुणाचीही तक्रार करण्यासाठी आलेलो नाही, असा दावा दिल्लीला गेलेल्या एका नेत्याने केला.
-तर पक्ष संकटात येईल!
भाजपचे संभाव्य उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. त्यांचे वजन लक्षात घेऊन नागपूरमध्ये वरून उमेदवार लादल्यास किंवा तुल्यबळ न दिल्यास त्याचे परिणाम लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होतील. इतकेच नाही तर, त्यानंतर अडीच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीतही पक्ष संकटात येईल. शहर काँग्रेस समितीकडे अर्ज केलेल्या इच्छुकांचाच विचार करण्यात यावा. पक्षाला बळकट करणाऱ्या शहर काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंतीही नेत्यांना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.