म. टा. प्रतिनिधी, नागपूर
सलग ५६ तास स्वयंपाक करण्याचा विक्रम आणि नंतर तीन हजार किलो खिचडी तयार करण्याचा विक्रम करणारे विक्रमवीर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आता तब्बल ३ हजार ५०० किलो वांग्यांचे भरीत करण्यास सज्ज झाले आहेत. आतापर्यंतचे विक्रम हे विष्णू मनोहर यांच्या नावावर असून, हा विक्रम मात्र सामूहिक स्वरूपाचा राहणार आहे.
मराठी प्रतिष्ठान व विष्णू मनोहर यांनी खानदेशच्या वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतला असून, ३ हजार ५०० किलोचे जळगावी वांग्याचे भरीत तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी २१ डिसेंबरला सकाळी ५ वाजता सुरूवात केली जाणार आहे. खानदेशी वांग्याच्या भरीताला आगळीवेगळी चव आहे. त्यामुळे या भरीताची सातासमुद्रापार ओळख व्हावी, या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले असल्याचे विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भरीतसाठी बामणोदची वांगी
भरीत तयार करण्यासाठी यावल तालुक्यातील बामणोद येथून ३ हजार २०० किलो वांगी आणण्यात येणार आहेत. भरीत बनविण्यासाठी लागणारी १० बाय १० फुटाची कढई नागपुरातून नुकतीच जळगावकडे रवाना झाली आहे. याच कढईमध्ये विष्णू मनोहर यांनी ३ हजार किलो खिचडी तयार केली होती. या कढईचे वजन ५५० किलो असून ती ठेवण्यासाठी ३५० किलोची चूल तयार करण्यात आली आहे. भरीतासाठी ५ फूट पाते व १० फूट दांडी असलेला सराटा बनवण्यात आला आहे.
असे लागणार साहित्य
भरीत तयार करण्यासाठी ३२०० किलो वांगे, १२० किलो शेंगदाणे तेल, १०० किलो मिरची, ५० किलो लसूण, २० किलो शेंगदाणे, ५ किलो जिरे, १०० किलो कोथिंबीर, २५ किलो मीठ वापरले जाणार आहे. जळणासाठी ८ ट्रॅक्टर काड्या व ५ मण सरपण वापरले जाणार आहे. ६० महिला, ४० पुरुष, २० सुपरवायजर व दोन मुख्य निरीक्षक इतके त्यासाठी मनुष्यबळ लागणार आहे.
सलग ५६ तास स्वयंपाक करण्याचा विक्रम आणि नंतर तीन हजार किलो खिचडी तयार करण्याचा विक्रम करणारे विक्रमवीर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आता तब्बल ३ हजार ५०० किलो वांग्यांचे भरीत करण्यास सज्ज झाले आहेत. आतापर्यंतचे विक्रम हे विष्णू मनोहर यांच्या नावावर असून, हा विक्रम मात्र सामूहिक स्वरूपाचा राहणार आहे.
मराठी प्रतिष्ठान व विष्णू मनोहर यांनी खानदेशच्या वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतला असून, ३ हजार ५०० किलोचे जळगावी वांग्याचे भरीत तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी २१ डिसेंबरला सकाळी ५ वाजता सुरूवात केली जाणार आहे. खानदेशी वांग्याच्या भरीताला आगळीवेगळी चव आहे. त्यामुळे या भरीताची सातासमुद्रापार ओळख व्हावी, या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले असल्याचे विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भरीतसाठी बामणोदची वांगी
भरीत तयार करण्यासाठी यावल तालुक्यातील बामणोद येथून ३ हजार २०० किलो वांगी आणण्यात येणार आहेत. भरीत बनविण्यासाठी लागणारी १० बाय १० फुटाची कढई नागपुरातून नुकतीच जळगावकडे रवाना झाली आहे. याच कढईमध्ये विष्णू मनोहर यांनी ३ हजार किलो खिचडी तयार केली होती. या कढईचे वजन ५५० किलो असून ती ठेवण्यासाठी ३५० किलोची चूल तयार करण्यात आली आहे. भरीतासाठी ५ फूट पाते व १० फूट दांडी असलेला सराटा बनवण्यात आला आहे.
असे लागणार साहित्य
भरीत तयार करण्यासाठी ३२०० किलो वांगे, १२० किलो शेंगदाणे तेल, १०० किलो मिरची, ५० किलो लसूण, २० किलो शेंगदाणे, ५ किलो जिरे, १०० किलो कोथिंबीर, २५ किलो मीठ वापरले जाणार आहे. जळणासाठी ८ ट्रॅक्टर काड्या व ५ मण सरपण वापरले जाणार आहे. ६० महिला, ४० पुरुष, २० सुपरवायजर व दोन मुख्य निरीक्षक इतके त्यासाठी मनुष्यबळ लागणार आहे.