म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
'एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी त्यात त्याच्या मृत्यूला कुणाला जबाबदार ठरविले असेल, तर त्याआधारे त्याला दोषी ठरविता येणार नाही,' असे निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदवले.
अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलिसांनी मुख्य आरोपी राकेश खुराणा व इतर चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, आत्महत्येस प्रवृत्त करणे याअंतर्गत एफआयआर नोंदवला होता. तो एफआयआर रद्द करण्यासाठी राकेश वगळता इतर चार आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. झेड. ए. हक व न्या. पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झली. तेव्हा हायकोर्टाने मदन मोहन सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा दाखला देत तथ्यहिन व असंबंधित आरोप खटल्याचा आधार होऊ शकत नाही, असा निर्णय दिला तसेच आरोपींचा अर्ज मंजूर करून वादग्रस्त एफआयआर रद्द केला.
मोहन गजबे याच्या दोन मुलांना वेकोलित नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले होते. त्यासाठी सुमारे १ कोटी रुपये आरोपींनी घेतले. त्यानंतर गजबे यांच्या मुलांना नोकरी दिली नाही व पैसेही परत केले नाही. त्यामुळे गजबे यांनी दबावाखाली येऊन आत्महत्या केली, अशी तक्रार कल्पना गजबे यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मृत गजबे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पाच आरोपींच्या नावाचा उल्लेख केला होता. परंतु, सदर चिठ्ठी हा सबळ पुरावा नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.
'एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी त्यात त्याच्या मृत्यूला कुणाला जबाबदार ठरविले असेल, तर त्याआधारे त्याला दोषी ठरविता येणार नाही,' असे निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदवले.
अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलिसांनी मुख्य आरोपी राकेश खुराणा व इतर चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, आत्महत्येस प्रवृत्त करणे याअंतर्गत एफआयआर नोंदवला होता. तो एफआयआर रद्द करण्यासाठी राकेश वगळता इतर चार आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. झेड. ए. हक व न्या. पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झली. तेव्हा हायकोर्टाने मदन मोहन सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा दाखला देत तथ्यहिन व असंबंधित आरोप खटल्याचा आधार होऊ शकत नाही, असा निर्णय दिला तसेच आरोपींचा अर्ज मंजूर करून वादग्रस्त एफआयआर रद्द केला.
मोहन गजबे याच्या दोन मुलांना वेकोलित नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले होते. त्यासाठी सुमारे १ कोटी रुपये आरोपींनी घेतले. त्यानंतर गजबे यांच्या मुलांना नोकरी दिली नाही व पैसेही परत केले नाही. त्यामुळे गजबे यांनी दबावाखाली येऊन आत्महत्या केली, अशी तक्रार कल्पना गजबे यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मृत गजबे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पाच आरोपींच्या नावाचा उल्लेख केला होता. परंतु, सदर चिठ्ठी हा सबळ पुरावा नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.