म.टा.प्रतिनिधी, नागपूर
महावितरणची प्रतिमा मलीन करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आणि कामात हलगर्जी करणाऱ्या बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर आगामी काळात कारवाईची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे संकेत महावितरणच्या सूत्रांनी दिले आहेत.
कार्यालयीन वेळेत हजार नसणाऱ्या आणि आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर अंकुश न ठेवणाऱ्या खापरखेडा येथील एका कर्मचाऱ्यावर केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर बिलिंग विभागात 'स्वछता अभियान' राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
वीजग्राहकांना योग्य वाचनाची देयके जात आहेत की नाही, देयकाची रक्कम योग्य आहे किंवा नाही, हे पाहिले जात आहे. शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून थकबाकीदार वीजग्राहकांची छाननी करून यादी वेळोवेळी उपलब्ध करून देण्याची जवाबदारी उपविभागातील कनिष्ठ लिपिकाची असते. पण, अनेक ठिकाणी कनिष्ठ लिपिक कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. फेब्रुवारी महिन्यातील देयक वसुलीची अंतिम माहिती ५ मार्चपर्यंत आल्यानंतर बिलिंग विभागातील लिपिकांच्या कामाचा आढावा घेऊन हलगर्जीपणा करणाऱ्या लिपिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
वीजग्राहकांना दर्जेदार वीजसेवा देण्यासोबतच अचूक नोंदीचे देयक वीजग्राहकास देण्यास महावितरण बांधील आहे. कामचुकार लिपिकांमुळे वीजग्राहकांना विनाकारण त्रास होतो, जनमानसात महावितरणची प्रतिमा मलीन होते, ही बाब लक्षात घेऊन महावितरणकडून आगामी काळात अशाप्रकारच्या कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील 'वीजग्राहकांना त्रास होणार नाही, त्यांना चांगली सेवा द्या', अशाप्रकारचे निर्देश महावितरण प्रशासनास दिले आहेत. परिमंडळात येणाऱ्या उपविभागातील काही उच्चस्तर लिपिकही कामात हलगर्जी करीत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा लिपिकांची यादी कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकारी वर्गाकडून मागवण्यात येणार आहे. महावितरणकडून अभियंत्याप्रमाणे लिपिकांवरदेखील कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
महावितरणची प्रतिमा मलीन करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आणि कामात हलगर्जी करणाऱ्या बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर आगामी काळात कारवाईची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे संकेत महावितरणच्या सूत्रांनी दिले आहेत.
कार्यालयीन वेळेत हजार नसणाऱ्या आणि आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर अंकुश न ठेवणाऱ्या खापरखेडा येथील एका कर्मचाऱ्यावर केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर बिलिंग विभागात 'स्वछता अभियान' राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
वीजग्राहकांना योग्य वाचनाची देयके जात आहेत की नाही, देयकाची रक्कम योग्य आहे किंवा नाही, हे पाहिले जात आहे. शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून थकबाकीदार वीजग्राहकांची छाननी करून यादी वेळोवेळी उपलब्ध करून देण्याची जवाबदारी उपविभागातील कनिष्ठ लिपिकाची असते. पण, अनेक ठिकाणी कनिष्ठ लिपिक कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. फेब्रुवारी महिन्यातील देयक वसुलीची अंतिम माहिती ५ मार्चपर्यंत आल्यानंतर बिलिंग विभागातील लिपिकांच्या कामाचा आढावा घेऊन हलगर्जीपणा करणाऱ्या लिपिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
वीजग्राहकांना दर्जेदार वीजसेवा देण्यासोबतच अचूक नोंदीचे देयक वीजग्राहकास देण्यास महावितरण बांधील आहे. कामचुकार लिपिकांमुळे वीजग्राहकांना विनाकारण त्रास होतो, जनमानसात महावितरणची प्रतिमा मलीन होते, ही बाब लक्षात घेऊन महावितरणकडून आगामी काळात अशाप्रकारच्या कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील 'वीजग्राहकांना त्रास होणार नाही, त्यांना चांगली सेवा द्या', अशाप्रकारचे निर्देश महावितरण प्रशासनास दिले आहेत. परिमंडळात येणाऱ्या उपविभागातील काही उच्चस्तर लिपिकही कामात हलगर्जी करीत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा लिपिकांची यादी कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकारी वर्गाकडून मागवण्यात येणार आहे. महावितरणकडून अभियंत्याप्रमाणे लिपिकांवरदेखील कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.