म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा रुग्णालयांमध्ये 'मेमरी क्लिनिक' सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे अशा रुग्णांसाठी 'डे केअर सेंटर' सुरू करण्यात येणार आहेत.
आयुर्मानात वाढ झाल्याने अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत. याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत अभियान स्वरूपात जाणीवजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून अल्झायमरविषयी 'अर्ली डिटेक्शन सेंटर' सुरू करण्यात येईल. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्तीविषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येईल.
पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग या सहा ठिकाणी पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर 'डे केअर सेंटर' सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येईल. त्याचबरोबर रुग्णाच्या शुश्रूषेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा रुग्णालयांमध्ये 'मेमरी क्लिनिक' सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे अशा रुग्णांसाठी 'डे केअर सेंटर' सुरू करण्यात येणार आहेत.
आयुर्मानात वाढ झाल्याने अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत. याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत अभियान स्वरूपात जाणीवजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून अल्झायमरविषयी 'अर्ली डिटेक्शन सेंटर' सुरू करण्यात येईल. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्तीविषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येईल.
पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग या सहा ठिकाणी पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर 'डे केअर सेंटर' सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येईल. त्याचबरोबर रुग्णाच्या शुश्रूषेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.