म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर
'आपली बस'चे रंग दिसण्यास सुरुवात झाली आहे. दीडशे कोटीतून थकबाकी असलेली रक्कम मिळणार असल्याने कंत्राटदार आनंदी होते. मात्र,यातील केवळ ३० टक्केच वाटा मिळणार, अशी माहिती मिळाल्यावर नाराजी पसरली आहे. त्यामुळेच की काय शाळा व कॉलेजल सुटी लागण्याचे कारण पुढे करीत एक दोन नव्हे तर एका झटक्यात तब्बल ३९ बसेसची सेवा बंद करण्यात आल्या. या सर्व बस वर्दळीच्या मार्गावरील आहेत. दिवाळीचे दिवस असून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. अशावेळी बस बंद झाल्याने नागपूरकरांना जादा पैसे मोजून दुसऱ्या साधनांचा वापर करावा लागतो आहे.
शाळा कॉलेजला सुटी असल्याने बंद करण्यात आलेल्या एकूण १३ बसेसमध्ये बर्डी-पिपळाफाटा व बर्डी, पारडी ते वायसीसीई, यशोधरानगर व टाकळघाट तसेच पिपळा फाटा ते वायसीसीई आदी बसमार्गावरील बसेसचा समावेश आहे. याशिवाय आर. के. सिटी बस कंत्राटदाराने १२ बार्गावरील बस बंद केल्या. यात बेसा ते गोरेवाडा, पारडी ते जयताळा, खरबी ते जयताळा, बर्डी ते ब्राह्मणीफाटा, बर्डी ते कामठी, बर्डी ते शांतीनगर मार्गे कामठी तसेच दीक्षाभूमी ते समतानगर या बसमार्गाचा समावेश आहे. हंसा सिटी बस सर्व्हिसेसने एकूण १४ मार्गावरील बस बंद केल्या. यात बर्डी ते हिंगणा, इसासनी, गोधनी, बेलतरोडी, आलेसूर, बहादूरा फाटा, वडधामना, गिडोबानगर, पावननगर तसेच बहादुरफाटा ते वायसीसीई आणि जेएन हॉस्पिटल ते इंडोरामा गेट या मार्गावरील काही बस अशा एकूण ३९ बसचा समावेश आहे.
कंत्राटदारांसोबत करार करताना तिन्ही कंत्राटदारांनी साधारण, मिडी व मिनी अशा एकूण ४५० बस रस्त्यांवर उतराव्यात असे ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात ३८७ बसेस रस्त्यांवर आल्या. त्यात वेगवेगळी कारणे पुढे करून ही संख्या ३२० वर आली. कालपरवापर्यंत एवढ्याच बस रस्त्यांवर धावत होत्या. आता त्यात ३९ बसची भर पडून ही संख्या २८१ वर आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. शाळा व कॉलेजला सुटी असली तरी या मार्गावरून प्रवासी बसमध्ये प्रवास करीत होते. त्यामुळे ही बस रिकामी जात नव्हती. आता कंत्राटदार व परिवहन विभाग त्यांच्या समाधानासाठी कारणे पुढे करीत असली तरी याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. परिवहन विभागाने या बसमधून प्रवासी प्रवास करीत असल्याचे व पासधारक असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र, दिवाळी सण चार दिवसांवर आला असल्याने खरेदीला जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. प्रत्येकजण बाजारपेठेतील पार्किंगच्या कारणामुळे त्यांचे वाहन घेऊन जात नाही. यातील किमान ५०टक्के बस उपलब्ध असली तर बसचा वापर करतात. आता या प्रवाशांना ऑटोसाठी जादा भाडे मोजावे लागतील. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
'आपली बस'चे रंग दिसण्यास सुरुवात झाली आहे. दीडशे कोटीतून थकबाकी असलेली रक्कम मिळणार असल्याने कंत्राटदार आनंदी होते. मात्र,यातील केवळ ३० टक्केच वाटा मिळणार, अशी माहिती मिळाल्यावर नाराजी पसरली आहे. त्यामुळेच की काय शाळा व कॉलेजल सुटी लागण्याचे कारण पुढे करीत एक दोन नव्हे तर एका झटक्यात तब्बल ३९ बसेसची सेवा बंद करण्यात आल्या. या सर्व बस वर्दळीच्या मार्गावरील आहेत. दिवाळीचे दिवस असून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. अशावेळी बस बंद झाल्याने नागपूरकरांना जादा पैसे मोजून दुसऱ्या साधनांचा वापर करावा लागतो आहे.
शाळा कॉलेजला सुटी असल्याने बंद करण्यात आलेल्या एकूण १३ बसेसमध्ये बर्डी-पिपळाफाटा व बर्डी, पारडी ते वायसीसीई, यशोधरानगर व टाकळघाट तसेच पिपळा फाटा ते वायसीसीई आदी बसमार्गावरील बसेसचा समावेश आहे. याशिवाय आर. के. सिटी बस कंत्राटदाराने १२ बार्गावरील बस बंद केल्या. यात बेसा ते गोरेवाडा, पारडी ते जयताळा, खरबी ते जयताळा, बर्डी ते ब्राह्मणीफाटा, बर्डी ते कामठी, बर्डी ते शांतीनगर मार्गे कामठी तसेच दीक्षाभूमी ते समतानगर या बसमार्गाचा समावेश आहे. हंसा सिटी बस सर्व्हिसेसने एकूण १४ मार्गावरील बस बंद केल्या. यात बर्डी ते हिंगणा, इसासनी, गोधनी, बेलतरोडी, आलेसूर, बहादूरा फाटा, वडधामना, गिडोबानगर, पावननगर तसेच बहादुरफाटा ते वायसीसीई आणि जेएन हॉस्पिटल ते इंडोरामा गेट या मार्गावरील काही बस अशा एकूण ३९ बसचा समावेश आहे.
कंत्राटदारांसोबत करार करताना तिन्ही कंत्राटदारांनी साधारण, मिडी व मिनी अशा एकूण ४५० बस रस्त्यांवर उतराव्यात असे ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात ३८७ बसेस रस्त्यांवर आल्या. त्यात वेगवेगळी कारणे पुढे करून ही संख्या ३२० वर आली. कालपरवापर्यंत एवढ्याच बस रस्त्यांवर धावत होत्या. आता त्यात ३९ बसची भर पडून ही संख्या २८१ वर आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. शाळा व कॉलेजला सुटी असली तरी या मार्गावरून प्रवासी बसमध्ये प्रवास करीत होते. त्यामुळे ही बस रिकामी जात नव्हती. आता कंत्राटदार व परिवहन विभाग त्यांच्या समाधानासाठी कारणे पुढे करीत असली तरी याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. परिवहन विभागाने या बसमधून प्रवासी प्रवास करीत असल्याचे व पासधारक असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र, दिवाळी सण चार दिवसांवर आला असल्याने खरेदीला जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. प्रत्येकजण बाजारपेठेतील पार्किंगच्या कारणामुळे त्यांचे वाहन घेऊन जात नाही. यातील किमान ५०टक्के बस उपलब्ध असली तर बसचा वापर करतात. आता या प्रवाशांना ऑटोसाठी जादा भाडे मोजावे लागतील. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.