-नीलिमा पी. हारोडे, नागपूर
परतवाड्यातील आमचे राहते घर म्हणजे ‘किराड-वाडा’. तेथील चाळ आम्ही भाड्याने दिली होती. त्यात एका छोटेखानी घरात प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या पत्नी रमाबाई आणि पुत्र बाळ ठाकरेंसोबत वास्तव्याला होते. बाळासाहेब आमच्या घरी राहायचे हे आता सांगितले तरी मैत्रिणींना आश्चर्याचा धक्का बसतो. २३ जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन; त्यानिमित्ताने ठाकरे परिवाराच्या परतवाडा येथील वास्तव्यादरम्यानच्या आठवणींना दिलेला उजाळा...
ही घटना आहे २००४मधील. एक दिवस अगदी सकाळीच माझ्या वडिलांचा फोन आला, ‘आज दुपारी उद्धव ठाकरे आपल्या घरी येणार आहेत’, असे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी तो सुखद धक्का होता. हा निरोप देणारा फोन दस्तुरखुद बाळासाहेब ठाकरेंनी केला, हे समजल्यानंतर अत्यानंद झाला. या एका फोनने फक्त आमच्या घरचे नव्हे तर संपूर्ण परतवाडा शहराचेच वातावरण बदलून गेले. अचानक सगळीकडे उत्साह संचारला. उत्सवी हुरूप दाटून आला. शिवसेनाप्रमुखांचा फोन येणे आणि उद्धव ठाकरे भेट देतील, हे सांगणे निश्चितच आमच्यासाठी मोठी घटना होती. अर्थात, त्यांनी आमच्या घरी भेट देण्यामागे कारणही तेवढेच महत्त्वाचे होते.
परतवाड्यातील आमचे राहते घर म्हणजे ‘किराड-वाडा’. तेथील चाळ आम्ही भाड्याने दिली होती. त्यात एका छोटेखानी घरात प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या पत्नी रमाबाई आणि पुत्र बाळ ठाकरेंसोबत वास्तव्याला होते. बाळासाहेब आमच्या घरी राहायचे हे आता सांगितले तरी मैत्रिणींना आश्चर्याचा धक्का बसतो. ते स्वाभाविकही आहे. मी लहान असताना माझे आजोबा व वडील रामेश्वरजी उघडे मला या गोष्टीची नेहमी आठवण करून द्यायचे. मलादेखील फार अप्रूप वाटायचे. मुळात आमचा वाडा एवढा विस्तीर्ण होता की तिथे क्रिकेट वा तत्सम मैदानी खेळ सहज मनसोक्त खेळता यायचे. आमचे राहते घरही होते अगदी प्रशस्त, ऐसपैस. सर्वांनी मोहात पडावे असे.
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २००४मध्ये सर्वप्रथम वाड्याला भेट दिली होती. वास्तू जपण्याचा संकल्प त्यांनी तेव्हाच केला. काही न्यायालयीन भानगडींमुळे त्यावर लगेच निर्णय होऊ शकला नाही. माझ्या वडिलांनी त्यांना दुसरी जागा बक्षीसपत्र म्हणून दिली. तिथे माझ्या पणजोबांच्या नावाने पूर्वापार चालत आलेले धर्मार्थ औषधालय होते. त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आणि मातोश्री रमाबाई ठाकरे स्मृती सभागृह बनवण्यात आले. त्यासाठीचा निधी संजय राऊत यांनी त्यांच्या खासदार निधीतून त्वरीत मिळवून दिला.
या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आमच्या घराला भेट दिली. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा त्याच वास्तूला दोनवेळा भेट दिली. किराडवाडा आणि उघडे परिवार हे आमचे आजोळ असल्याचा वारंवार उच्चार त्यांनी केला. केवळ वैयक्तिक चर्चेपूरता हा संदर्भ न ठेवता अलीकडील नागपूर अधिवेशनात या सर्व बाबींचा त्यांनी विस्ताराने उल्लेख केला हे विशेष. समारोपीय भाषणात स्वत:ला ‘विदर्भाचा नातू’ असा शब्दप्रयोग त्यांनी केला. ‘अमरावती जिल्ह्याच्या परतवाड्यातील किराडवाडा हे माझे आजोळ आहे’, असे त्यांनी सांगितले. थोड्याच वेळात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी परतवाड्याकडे धाव घेतली. मला वैयक्तिकरित्या असे वाटले की, परतवाडा अशी पावनभूमी आहे जिथे अनमोल रत्न उदयास आले. त्यात बाळासाहेब ठाकरे सर्वोच्च स्थानावर आहेतच, पण वक्तादशसहस्रेशू राम शेवाळकर, शैल चतुर्वेदी, प्रदीप चौबे, राम नगरकर, मधुप पांडेय, राजा धर्माधिकारी यांचाही उल्लेख क्रमप्राप्त ठरतो. मुंबईच्या नजरा विदर्भाकडे वळविण्यास बाध्य करणारे कलावंत विवेक रानडेही तिथलेच. स्वामी चक्रधरांचे वास्तव्य त्या ठिकाणी होते. स्वातंत्र्य आंदोलनाच्या झपाटलेल्या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट आदींच्या भूमीगत वास्तव्याने झपाटलेला हा वाडा आहे. आमच्या वाड्याची पायधूळ उन्नतीची प्रेरणा देणारी आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांचे लोकाभिमुख स्मारक तिथे बांधले तर अधिक उपयुक्त ठरेलच, मात्र रोजगार निर्मिती होईल असा प्रकल्प राबविल्यास ती खरी श्रद्धांजली ठरेल. निव्वळ मोठ्या उंचीच्या पुतळ्यांपेक्षा रोजगाराभिमुख स्मारकाचे निर्माण तिथे व्हावे असे वाटते. तसे झाल्यास त्या स्मारकालाही एक वेगळी वैचारिक आणि वास्तववादी उंची लाभेल. नागपूरला अलीकडेच झालेल्या भेटीत मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांची खूप आस्थेवाईकपणे विचारपूस केली. कितीही मोठे झालोत तरी लहानपणचा ओलावा अस्तंगत होणे शक्य नसते. तो जपण्याची संधी परतवाड्याच्या वाड्यामुळे मुख्यमंत्र्यांना लाभली आहे. माझ्या विनंतीला मान देऊन उर्वरित इच्छाही त्यांनी पूर्ण करावी, अशी माझी आग्रहाची नम्र विनंती. आजोळविषयीची त्यांची आत्मियता बघता ही इच्छा मान्य होईलच हा विश्वासही मनात आहे. २३ जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन आहे. यानिमित्त ठाकरे परिवाराचे आजोळ जपणाऱ्या विदर्भाचा प्रदेशाचा अधिक वेगाने विकास व्हावा, अशी कामना आपण करूयात.
परतवाड्यातील आमचे राहते घर म्हणजे ‘किराड-वाडा’. तेथील चाळ आम्ही भाड्याने दिली होती. त्यात एका छोटेखानी घरात प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या पत्नी रमाबाई आणि पुत्र बाळ ठाकरेंसोबत वास्तव्याला होते. बाळासाहेब आमच्या घरी राहायचे हे आता सांगितले तरी मैत्रिणींना आश्चर्याचा धक्का बसतो. २३ जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन; त्यानिमित्ताने ठाकरे परिवाराच्या परतवाडा येथील वास्तव्यादरम्यानच्या आठवणींना दिलेला उजाळा...
ही घटना आहे २००४मधील. एक दिवस अगदी सकाळीच माझ्या वडिलांचा फोन आला, ‘आज दुपारी उद्धव ठाकरे आपल्या घरी येणार आहेत’, असे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी तो सुखद धक्का होता. हा निरोप देणारा फोन दस्तुरखुद बाळासाहेब ठाकरेंनी केला, हे समजल्यानंतर अत्यानंद झाला. या एका फोनने फक्त आमच्या घरचे नव्हे तर संपूर्ण परतवाडा शहराचेच वातावरण बदलून गेले. अचानक सगळीकडे उत्साह संचारला. उत्सवी हुरूप दाटून आला. शिवसेनाप्रमुखांचा फोन येणे आणि उद्धव ठाकरे भेट देतील, हे सांगणे निश्चितच आमच्यासाठी मोठी घटना होती. अर्थात, त्यांनी आमच्या घरी भेट देण्यामागे कारणही तेवढेच महत्त्वाचे होते.
परतवाड्यातील आमचे राहते घर म्हणजे ‘किराड-वाडा’. तेथील चाळ आम्ही भाड्याने दिली होती. त्यात एका छोटेखानी घरात प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या पत्नी रमाबाई आणि पुत्र बाळ ठाकरेंसोबत वास्तव्याला होते. बाळासाहेब आमच्या घरी राहायचे हे आता सांगितले तरी मैत्रिणींना आश्चर्याचा धक्का बसतो. ते स्वाभाविकही आहे. मी लहान असताना माझे आजोबा व वडील रामेश्वरजी उघडे मला या गोष्टीची नेहमी आठवण करून द्यायचे. मलादेखील फार अप्रूप वाटायचे. मुळात आमचा वाडा एवढा विस्तीर्ण होता की तिथे क्रिकेट वा तत्सम मैदानी खेळ सहज मनसोक्त खेळता यायचे. आमचे राहते घरही होते अगदी प्रशस्त, ऐसपैस. सर्वांनी मोहात पडावे असे.
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २००४मध्ये सर्वप्रथम वाड्याला भेट दिली होती. वास्तू जपण्याचा संकल्प त्यांनी तेव्हाच केला. काही न्यायालयीन भानगडींमुळे त्यावर लगेच निर्णय होऊ शकला नाही. माझ्या वडिलांनी त्यांना दुसरी जागा बक्षीसपत्र म्हणून दिली. तिथे माझ्या पणजोबांच्या नावाने पूर्वापार चालत आलेले धर्मार्थ औषधालय होते. त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आणि मातोश्री रमाबाई ठाकरे स्मृती सभागृह बनवण्यात आले. त्यासाठीचा निधी संजय राऊत यांनी त्यांच्या खासदार निधीतून त्वरीत मिळवून दिला.
या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आमच्या घराला भेट दिली. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा त्याच वास्तूला दोनवेळा भेट दिली. किराडवाडा आणि उघडे परिवार हे आमचे आजोळ असल्याचा वारंवार उच्चार त्यांनी केला. केवळ वैयक्तिक चर्चेपूरता हा संदर्भ न ठेवता अलीकडील नागपूर अधिवेशनात या सर्व बाबींचा त्यांनी विस्ताराने उल्लेख केला हे विशेष. समारोपीय भाषणात स्वत:ला ‘विदर्भाचा नातू’ असा शब्दप्रयोग त्यांनी केला. ‘अमरावती जिल्ह्याच्या परतवाड्यातील किराडवाडा हे माझे आजोळ आहे’, असे त्यांनी सांगितले. थोड्याच वेळात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी परतवाड्याकडे धाव घेतली. मला वैयक्तिकरित्या असे वाटले की, परतवाडा अशी पावनभूमी आहे जिथे अनमोल रत्न उदयास आले. त्यात बाळासाहेब ठाकरे सर्वोच्च स्थानावर आहेतच, पण वक्तादशसहस्रेशू राम शेवाळकर, शैल चतुर्वेदी, प्रदीप चौबे, राम नगरकर, मधुप पांडेय, राजा धर्माधिकारी यांचाही उल्लेख क्रमप्राप्त ठरतो. मुंबईच्या नजरा विदर्भाकडे वळविण्यास बाध्य करणारे कलावंत विवेक रानडेही तिथलेच. स्वामी चक्रधरांचे वास्तव्य त्या ठिकाणी होते. स्वातंत्र्य आंदोलनाच्या झपाटलेल्या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट आदींच्या भूमीगत वास्तव्याने झपाटलेला हा वाडा आहे. आमच्या वाड्याची पायधूळ उन्नतीची प्रेरणा देणारी आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांचे लोकाभिमुख स्मारक तिथे बांधले तर अधिक उपयुक्त ठरेलच, मात्र रोजगार निर्मिती होईल असा प्रकल्प राबविल्यास ती खरी श्रद्धांजली ठरेल. निव्वळ मोठ्या उंचीच्या पुतळ्यांपेक्षा रोजगाराभिमुख स्मारकाचे निर्माण तिथे व्हावे असे वाटते. तसे झाल्यास त्या स्मारकालाही एक वेगळी वैचारिक आणि वास्तववादी उंची लाभेल. नागपूरला अलीकडेच झालेल्या भेटीत मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांची खूप आस्थेवाईकपणे विचारपूस केली. कितीही मोठे झालोत तरी लहानपणचा ओलावा अस्तंगत होणे शक्य नसते. तो जपण्याची संधी परतवाड्याच्या वाड्यामुळे मुख्यमंत्र्यांना लाभली आहे. माझ्या विनंतीला मान देऊन उर्वरित इच्छाही त्यांनी पूर्ण करावी, अशी माझी आग्रहाची नम्र विनंती. आजोळविषयीची त्यांची आत्मियता बघता ही इच्छा मान्य होईलच हा विश्वासही मनात आहे. २३ जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन आहे. यानिमित्त ठाकरे परिवाराचे आजोळ जपणाऱ्या विदर्भाचा प्रदेशाचा अधिक वेगाने विकास व्हावा, अशी कामना आपण करूयात.