नागपूर : खंडणी न दिल्याने चौघांनी पानठेलाचालकावर सशस्त्र हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना यशोधरानगरमधील राजीवगांधीनगर भागात सोमवारी रात्री घडली. समीर अहमद जाकीर अहमद शेख (३२), असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी समीर खान समशेर खान (२५), अब्दुल शारिक अब्दुल रफीक व संजय टिकमदास कुरे या तिघांना अटक केली आहे. पोलिस तिघांच्या अन्य एका साथीदाराचा शोध घेत आहेत.
प्राणघातक हल्ला
खंडणी न दिल्याने चौघांनी पानठेलाचालकावर सशस्त्र हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला...
Maharashtra Times 5 Sep 2018, 4:00 am