नागपूर : एटीएम मशिन हॅक करून मिळालेल्या चोरीच्या पैशांतून हॅकर्स टोळीतील सदस्यांनी कानपूरमध्ये प्रशस्त बंगले बांधल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या टोळीतील दोघांना अटक करून नंदनवन पोलिसांनी त्यांची चार दिवसांची पोलिस कोठडी घेतली. शितेश ऊर्फ गोल्डन शिवलाल वर्मा (वय २६) व आशुतोष ऊर्फ आशू सुरेशकुमार चौहान (वय २६),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या टोळीने २३ जूनला नंदनवनमधील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे एटीएम हॅक करून पावणेचार लाखांची रोख चोरी केली होती. पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवन पोलिसांनी हायटेक तपास करून दोघांना कानपूर येथे अटक केली होती. अर्जुन सिंग या टोळीचा सूत्रधार आहे. अर्जुन यानेच दोघांना एटीएम हॅक करून पैसे काढण्याचे प्रशिक्षण दिले होते. आशुतोष याला यापूर्वीही अशाच प्रकरणात गुजरात पोलिसांनी अटक केली होती.
एटीएम हॅकर्सचे प्रशस्त बंगले
एटीएम मशिन हॅक करून मिळालेल्या चोरीच्या पैशांतून हॅकर्स टोळीतील सदस्यांनी कानपूरमध्ये प्रशस्त बंगले बांधल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे...
Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am