नागपूर : संचारबंदीत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या युवकांना हटकल्याने त्यांनी पोलिसावर हल्ला केला. यात एक पोलिस जखमी झाला. ही घटना राजारामनगर भागात घडली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. आजन आशिक सय्यद (वय १९), अर्ष आशिक सय्यद (वय २१) आणि राज अंकुश नेवारे (वय १९, तिन्ही रा. राजारामनगर, चिंचभुवन) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी सूरज निंबाळकर (वय ३६) हे राजारामनगर परिसरात गस्त घालत होते. तिघेही विनाकारण फिरताना निंबाळकर यांना दिसले. त्यांनी तिघांना हटकले. त्यामुळे तिघेही संतापले. त्यांनी निंबाळकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. निंबाळकर जखमी झाले. त्यांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी तिघांनाही अटक केली. तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हटकले म्हणून पोलिसावर हल्ला
संचारबंदीत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या युवकांना हटकल्याने त्यांनी पोलिसावर हल्ला केला यात एक पोलिस जखमी झाला ही घटना राजारामनगर भागात घडली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2020, 4:00 am