म.टा. प्रतिनिधी, नागपूर
यंदा मान्सून अपेक्षेनुसार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला होता. मान्सूनचा अखेरचा महिना अर्धा संपत आलेला असतानासुद्धा अद्याप निम्म्याहून अधिक विदर्भात पावसाने सरासरी गाठलेली नाही. अपेक्षित पावसाच्या १० टक्के कमी किंवा अधिक पाऊस झाल्यास सरासरी पाऊस झाल्याचे मानले जाते. परंतु कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे.
मान्सूनचे तीन महिने उलटल्यानंतरसुद्धा विदर्भातील अकरापैकी सात जिल्ह्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यात नागपूर विभागातील चार, तर अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. यात बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यामंध्ये अद्याप पर्जन्यमानाने सरासरी गाठलेली नाही. सुरुवातीला बुलडाणा आणि वर्धा वगळल्यास इतर जिल्ह्यांमधील तूट ही फारशी नव्हती. परंतु आता चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातील तूटसुद्धा वाढली आहे. केवळ नागपूर, गडचिरोली, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. मान्सून संपण्यासाठी अद्याप एक महिना शिल्लक असून, या कालावधीत पर्जन्यमानातील ही तूट भरून निघेल, अशी अपेक्षा हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येत होती. परंतु सप्टेंबर महिना अर्धा संपत आलेला असल्याने शेतकरी परत एकदा चिंतातूर झालेला आहे. गेल्या आठवड्यापासून विदर्भात पावसाने दांडी मारली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात विदर्भातील अनेक शहरांमधील तापमानात वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात विदर्भातील तापमान हे सामान्य तापमानापेक्षा एक ते तीन अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच मान्सून सध्या हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. परिणामत: पुढील आठवड्यात विदर्भात फारशा पावसाचीसुद्धा शक्यता नाही. त्यामुळे उर्वरित सप्टेंबर महिन्यात सात जिल्ह्यातील पावसाची तूट कशी भरून निघणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा -- पर्जन्यमानाची टक्केवारी (१ जून ते १३ सप्टेंबर पर्यंत)
बुलडाणा ७३.८
वर्धा ७६.४
चंद्रपूर ७८.४
अमरावती ७८.१
भंडारा ८१.४
यवतमाळ ८२.७
गोंदिया ८८.४
नागपूर ९०.६
गडचिरोली १०२.२
अकोला १०६.२
वाशीम ११२.४
यंदा मान्सून अपेक्षेनुसार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला होता. मान्सूनचा अखेरचा महिना अर्धा संपत आलेला असतानासुद्धा अद्याप निम्म्याहून अधिक विदर्भात पावसाने सरासरी गाठलेली नाही. अपेक्षित पावसाच्या १० टक्के कमी किंवा अधिक पाऊस झाल्यास सरासरी पाऊस झाल्याचे मानले जाते. परंतु कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे.
मान्सूनचे तीन महिने उलटल्यानंतरसुद्धा विदर्भातील अकरापैकी सात जिल्ह्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यात नागपूर विभागातील चार, तर अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. यात बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यामंध्ये अद्याप पर्जन्यमानाने सरासरी गाठलेली नाही. सुरुवातीला बुलडाणा आणि वर्धा वगळल्यास इतर जिल्ह्यांमधील तूट ही फारशी नव्हती. परंतु आता चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातील तूटसुद्धा वाढली आहे. केवळ नागपूर, गडचिरोली, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. मान्सून संपण्यासाठी अद्याप एक महिना शिल्लक असून, या कालावधीत पर्जन्यमानातील ही तूट भरून निघेल, अशी अपेक्षा हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येत होती. परंतु सप्टेंबर महिना अर्धा संपत आलेला असल्याने शेतकरी परत एकदा चिंतातूर झालेला आहे. गेल्या आठवड्यापासून विदर्भात पावसाने दांडी मारली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात विदर्भातील अनेक शहरांमधील तापमानात वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात विदर्भातील तापमान हे सामान्य तापमानापेक्षा एक ते तीन अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच मान्सून सध्या हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. परिणामत: पुढील आठवड्यात विदर्भात फारशा पावसाचीसुद्धा शक्यता नाही. त्यामुळे उर्वरित सप्टेंबर महिन्यात सात जिल्ह्यातील पावसाची तूट कशी भरून निघणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा -- पर्जन्यमानाची टक्केवारी (१ जून ते १३ सप्टेंबर पर्यंत)
बुलडाणा ७३.८
वर्धा ७६.४
चंद्रपूर ७८.४
अमरावती ७८.१
भंडारा ८१.४
यवतमाळ ८२.७
गोंदिया ८८.४
नागपूर ९०.६
गडचिरोली १०२.२
अकोला १०६.२
वाशीम ११२.४