म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
स्टेट बँकेची तब्बल १३ लाखाने फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे बँकेने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.
राकेश व मंदा बोरकर यांनी वाहन खरेदी करण्यासाठी १३ लाख रुपयांच्या कर्जाकरिता स्टेट बँकेकडे अर्ज केला होता. बोगस कागदपत्रांच्या अधारे कार विक्रत्याच्या नावाने बँकेत खोत उघडण्यात आले हो. कर्जाची रक्कम त्या खात्यात जमा होताच आरोपींनी रक्कम काढून घेतली. परंतु, कार खरेदी करण्यात आली नाही. वारंवार पत्र दिल्यानंतरही बँकेत वाहनाचे कागदपत्रे जमा करण्यात आली नव्हती. त्यामुळे बँकेने आरोपींच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हा बॅकेने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, पोलिसांनी तांत्रिक कारण पुढे करीत तक्रार रद्द केली.
तेव्हा बँकेने सत्र न्यायालयात अपील दाखल केली. तिथेही बँकेला अपयश आले. सत्र न्यायालयाने अपील फेटाळल्याने बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सदर याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांना नोटीस बजावण्यात आली. याचिका प्रलंबित असतानाच दोन्ही आरोपींच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. सदर बाब उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. तेव्हा बँकेने दाखल केलेल्या याचिकाचे उद्देश पूर्ण झाल्याचे नमूद करीत याचिका निकाली काढण्यात आली.
स्टेट बँकेची तब्बल १३ लाखाने फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे बँकेने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.
राकेश व मंदा बोरकर यांनी वाहन खरेदी करण्यासाठी १३ लाख रुपयांच्या कर्जाकरिता स्टेट बँकेकडे अर्ज केला होता. बोगस कागदपत्रांच्या अधारे कार विक्रत्याच्या नावाने बँकेत खोत उघडण्यात आले हो. कर्जाची रक्कम त्या खात्यात जमा होताच आरोपींनी रक्कम काढून घेतली. परंतु, कार खरेदी करण्यात आली नाही. वारंवार पत्र दिल्यानंतरही बँकेत वाहनाचे कागदपत्रे जमा करण्यात आली नव्हती. त्यामुळे बँकेने आरोपींच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हा बॅकेने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, पोलिसांनी तांत्रिक कारण पुढे करीत तक्रार रद्द केली.
तेव्हा बँकेने सत्र न्यायालयात अपील दाखल केली. तिथेही बँकेला अपयश आले. सत्र न्यायालयाने अपील फेटाळल्याने बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सदर याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांना नोटीस बजावण्यात आली. याचिका प्रलंबित असतानाच दोन्ही आरोपींच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. सदर बाब उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. तेव्हा बँकेने दाखल केलेल्या याचिकाचे उद्देश पूर्ण झाल्याचे नमूद करीत याचिका निकाली काढण्यात आली.