म. टा. प्रतिनिधी, नागपूर
तरुणांनी फास्ट फूडच्या आहारी जाऊ नये. याउलट त्यांनी भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थांकडे वळावे, या उद्देशाने अन्न व औषधी प्रशासन विभागाने कॉलेजमधील कॅण्टीनमध्ये फास्ट फूड विकले जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. राज्यात या आदेशांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आदेशांतर्गत शहरातील तब्बल ६८ कॉलेजेसना अन्न व औषधी विभागातर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. कॉलेजमधील कॅण्टीनच्या मेन्यूमध्ये फास्ट फूड ठेवू नका, असे नोटीसवजा आवाहन करण्यात आले आहे.
तरुणांमध्ये फास्ट फूडची प्रचंड क्रेझ आहे. दिवसेंदिवस ही क्रेझ वाढते आहे. मात्र, फास्ट फूडमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यात लठ्ठपणा ही प्रमुख समस्या असून त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे रोग जडतात. हे टाळण्यासाठी तरुणांनी फास्ट फूड टाळावे, या उद्देशाने राज्याच्या अन्न व औषधी विभागाने हा आदेश काढला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाच्या नागपूर विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले ‘शहरातील ६८ कॉलेजेसना याबाबत नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. यात कॉलेजेसच्या कॅण्टीनमधील मेन्यू बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेन्यूमध्ये फास्ट फूड असता कामा नये. त्यात केवळ पांरपरिक खाद्यान्नाचा समावेश करण्यात यावा. तसे केल्यास कॅण्टीनमालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारसुद्धा विभागाला प्रदान करण्यात आले आहेत.’
या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही याचा पाठपुरावासुद्धा घेतला जात आहे. त्यासाठी एक समिती स्थापित करण्यात आली असून त्यात विभागाचा एक कर्मचारी, कॉलेजचे प्राध्यापक, कॅण्टीनचा मालक, पालक समितीतील एक सदस्य यांचा समावेश आहे. शहरातील ६८ कॉलेजेसला नोटीस पाठविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने डॉ. आंबेडकर सायन्स कॉलेज, शिवाजी कॉलेज, व्ही.एम.व्ही. कॉलेज, सी.पी. अॅण्ड बेरार कॉलेज, धनवटे कॉलेज, संताजी कॉलेज या आणि इतर कॉलेजेसचा समावेश आहे. त्यातील धनवटे कॉलेजने याची पूर्तता केली असून या कॉलेजमधील कॅण्टीनचा मेन्यू बदलण्यात आला आहे.
हे नको
पिझ्झा, पास्ता, नूडल्स, बर्गर, हॅमबर्गर, सॅण्डविच.
हे हवे
पोहे, उपमा, मोड आलेले कडधान्य, इडली.
तरुणांनी फास्ट फूडच्या आहारी जाऊ नये. याउलट त्यांनी भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थांकडे वळावे, या उद्देशाने अन्न व औषधी प्रशासन विभागाने कॉलेजमधील कॅण्टीनमध्ये फास्ट फूड विकले जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. राज्यात या आदेशांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आदेशांतर्गत शहरातील तब्बल ६८ कॉलेजेसना अन्न व औषधी विभागातर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. कॉलेजमधील कॅण्टीनच्या मेन्यूमध्ये फास्ट फूड ठेवू नका, असे नोटीसवजा आवाहन करण्यात आले आहे.
तरुणांमध्ये फास्ट फूडची प्रचंड क्रेझ आहे. दिवसेंदिवस ही क्रेझ वाढते आहे. मात्र, फास्ट फूडमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यात लठ्ठपणा ही प्रमुख समस्या असून त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे रोग जडतात. हे टाळण्यासाठी तरुणांनी फास्ट फूड टाळावे, या उद्देशाने राज्याच्या अन्न व औषधी विभागाने हा आदेश काढला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाच्या नागपूर विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले ‘शहरातील ६८ कॉलेजेसना याबाबत नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. यात कॉलेजेसच्या कॅण्टीनमधील मेन्यू बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेन्यूमध्ये फास्ट फूड असता कामा नये. त्यात केवळ पांरपरिक खाद्यान्नाचा समावेश करण्यात यावा. तसे केल्यास कॅण्टीनमालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारसुद्धा विभागाला प्रदान करण्यात आले आहेत.’
या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही याचा पाठपुरावासुद्धा घेतला जात आहे. त्यासाठी एक समिती स्थापित करण्यात आली असून त्यात विभागाचा एक कर्मचारी, कॉलेजचे प्राध्यापक, कॅण्टीनचा मालक, पालक समितीतील एक सदस्य यांचा समावेश आहे. शहरातील ६८ कॉलेजेसला नोटीस पाठविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने डॉ. आंबेडकर सायन्स कॉलेज, शिवाजी कॉलेज, व्ही.एम.व्ही. कॉलेज, सी.पी. अॅण्ड बेरार कॉलेज, धनवटे कॉलेज, संताजी कॉलेज या आणि इतर कॉलेजेसचा समावेश आहे. त्यातील धनवटे कॉलेजने याची पूर्तता केली असून या कॉलेजमधील कॅण्टीनचा मेन्यू बदलण्यात आला आहे.
हे नको
पिझ्झा, पास्ता, नूडल्स, बर्गर, हॅमबर्गर, सॅण्डविच.
हे हवे
पोहे, उपमा, मोड आलेले कडधान्य, इडली.