म. टा. प्रतिनिधी, नागपूर
लॉकडाउन काळातील भरमसाठ वीज बिले माफ केली नाही, तर राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेश माध्यमप्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी दिला.
भाजप सरकारच्या काळात महावितरणचे संचालक असलेले पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आले त्यावेळी महावितरणची थकबाकी २१ हजार कोटी होती. आता ४७ हजार कोटीपर्यंत गेली आहे. लॉकडाउन काळातील थकबाकी ७ हजार कोटी आहे. व्याज, कर्ज फेड उशिरा झाल्यामुळे होणारा दंड यामुळे थकबाकी वाढल्याचे दिसते आहे. भाजप सरकारच्या काळात चार वर्षे दुष्काळ होता, त्यामुळे वीज वापर वाढला होता. परिणामी, थकबाकीही वाढली होती. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या थकबाकीची कधीच पर्वा केली नाही. शेतकऱ्यांना हवा तेवढा वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने फडणवीस सरकारने धाडसाने अनेक निर्णय घेतले. त्यामुळे २०१९ मध्ये कृषी क्षेत्राचा वीज वापर ६० टक्क्यांनी वाढला. फडणवीस सरकारच्या काळात महावितरण फायद्यात होते, महावितरणने आयकरही भरला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. ले.
लॉकडाउन काळातील भरमसाठ वीज बिले माफ केली नाही, तर राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेश माध्यमप्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी दिला.
भाजप सरकारच्या काळात महावितरणचे संचालक असलेले पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आले त्यावेळी महावितरणची थकबाकी २१ हजार कोटी होती. आता ४७ हजार कोटीपर्यंत गेली आहे. लॉकडाउन काळातील थकबाकी ७ हजार कोटी आहे. व्याज, कर्ज फेड उशिरा झाल्यामुळे होणारा दंड यामुळे थकबाकी वाढल्याचे दिसते आहे. भाजप सरकारच्या काळात चार वर्षे दुष्काळ होता, त्यामुळे वीज वापर वाढला होता. परिणामी, थकबाकीही वाढली होती. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या थकबाकीची कधीच पर्वा केली नाही. शेतकऱ्यांना हवा तेवढा वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने फडणवीस सरकारने धाडसाने अनेक निर्णय घेतले. त्यामुळे २०१९ मध्ये कृषी क्षेत्राचा वीज वापर ६० टक्क्यांनी वाढला. फडणवीस सरकारच्या काळात महावितरण फायद्यात होते, महावितरणने आयकरही भरला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. ले.