म. टा. प्रतिनिधी, नागपूर
करोनासारख्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापन दिनानिमित्त स्थानिक पातळीवर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत जिल्हा राष्ट्रवादी युवकच्यावतीने शिबिर घेण्यात आले.
राष्ट्रवादीचे तरुण नेते सलील देशमुख यांच्या पुढाकाराने व जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी सामाजिक वावरसह अन्य सूचनांचे पालन करून गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात शिबिर आयोजित केले. उद्घाटनप्रसंगी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, बजरंगसिंह परिहार, दिनकर वानखेडे, देविदास घोडे, महेंद्र भांगे, राजाभाऊ ताकसांडे, राजू हदय्या, हेमंत भोतमांगे उपस्थित होते.
शैलेंद्र तिवारी व प्रदेश सचिव अमोल पालपल्लीवार यांच्यासह ५० हून अधिक तरुणांनी रक्तदान केले. शिबिरास अनिल बोकडे, नीरज तवानी, प्रणय जांभुळकर, प्रमोद जोंधळे, अजहर पटेल, आशिष वर्मा, कमलेश बांगडे, अजहर शेख, निषाद इंदूरकर, अजहर पटेल, सय्यद सुफियान, अमित पिचकाटे, प्रवीण पाटील, दयाशंकर दुबे, संजय तिवारी, तौसिफ शेख, सरवर अन्सारी, गोलू निपाने, आनंद चहांदे, कुणाल लारोकर, उज्ज्वल खिंची, रुद्र धाकडे, विशाल सहगल, शुभम गाठीबांधे, प्रभाकर घोराडकर, आकाश चिमनकर आदींचे सहकार्य लाभले.
जनहिताची कामे करा!
करोनामुळे सर्वत्र संकट आले. अशा कठीण स्थितीत सर्वसामान्यांची कामे कशा पद्धतीने होतील, यावर लक्ष द्यावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. गृहमंत्र्यांनी समाजमाध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लोकांच्या अधिकाधिक समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या. लॉकडाउनमुळे नागरिक अडचणीत आहेत. शहरात रोजगाराचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात खरीप हंगाम आहे. या काळात समस्या जाणून सहकार्य करण्यासाठी सर्वांनी अधिक सजग व सक्रिय व्हावे, असेही अनिल देशमुख म्हणाले.