गोंदिया : गाढवी नदीच्या तिरावर आमची गावे वसलेली आहेत. शेतातील पिकाचे उत्पादन घेण्याकरिता विजेचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने कृषिपंप असूनही हातचे पीक जाते. केशोरी-गडचिरोलीपर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण नसल्याने त्रास सहन करावा लागतो. या समस्यांकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खोदा बंदिया, वडेगाव, पुष्पनगर(अ), पुष्पनगर(ब) येथील शेतकèऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना खोडदा येथील रुपचंद बाळबुद्धे, वडगाव बंड्याचे उपसरपंच भोजराम निमकर, प्रधान सरकार, दिलीप सील व संबंधित गावातील शेतकरी उपस्थित होते.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात निवडणुकीवर बहिष्कार
गाढवी नदीच्या तिरावर आमची गावे वसलेली आहेत शेतातील पिकाचे उत्पादन घेण्याकरिता विजेचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने कृषिपंप असूनही हातचे पीक जाते...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2019, 4:00 am