म.टा. वृत्तसेवा, बुलडाणा
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याच्या वल्गना करीत आहेत. भाजपकडे बक्कळ पैसा जमा असल्यानेच ते मध्यावधीच्या बाता करीत आहेत. परंतु, कर्जमुक्तीला फाटा देण्याचे त्यांचे हे षडयंत्र शिवसेना हाणून पाडेल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती न मिळाल्यास राजकीय भूकंप ठरलेलाच आहे, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शेगाव येथे दिला. संतनगरी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले असता पत्रपरिषदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून शासनावर टीका केली.
राज्य सरकारने तत्त्वत: कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे सरसकट कर्जमुक्तीसाठी भाजप सरकारला सदबुद्धी मिळावी. शिवाय, राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, असे साकडे संत गजानन महाराजांच्या चरणी घातल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. नाशिक येथे कृषी अधिवेशन घेवून ‘मी कर्जमुक्त होणारच’ ही घोषणा केली. हे अभियान आजही सुरूच आहे. सत्तेत असो वा नसो, शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार शेतकऱ्यांसोबत शिवसेनेने उघडपणे पाठींबा देत संपात सहभाग घेतला. संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत हा लढा सुरूच राहील. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांसोबतच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारने ‘तत्त्वत: सरसकट’ला मान्यता दिली. त्यामुळे निकष वगैरे काय ठरवायचे ते त्यांना ठरवू देत. सातबारा मात्र कोरा झालाच पाहिजे. कर्जमुक्तीने आत्महत्यांचा प्रश्न सुटणार नसल्याचे भाजप ओरडून सांगते. मग प्राथमिक उपचार न करताच शेतकऱ्यांना मरू द्यायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करून आधी कर्जमुक्तीचा दिलासा आणि नंतर पुढील दूरगामी उपाययोजना आखा, असा सल्लाही यावेळी त्यांनी सरकारला दिला.
भाजप मध्यवधी निवडणुकीला तयार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका माडताना ते म्हणाले, भाजप कर्जमुक्तीच्या विरोधात होती. शिवसेनेच्या आणि शेतकरी एकजुटीच्या आंदोलनाने पायाखालची वाळू सरकत चाललेल्या मुख्यमंत्र्यांनी नमते घेतले. मंत्रिगटाच्या चर्चेत काय ती घोषणा झाली. आता याला मध्यावधीच्या नावाखाली फाटा देण्याचा डाव आखणाऱ्या भाजपचा मनसुबा शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी बक्कळ पैसा असल्यानेच ते मध्यावधीचे म्हणतात. त्यापेक्षा असलेला पैसा शेतकऱ्यांना द्या. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजकीय भूकंप होईलच, असे संकेत ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दिले.
पत्रपरिषदेला मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्यासह खासदार प्रतापराव जाधव, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार भावना गवळी, खासदार अरविंद सावंत, शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, दत्ता पाटील, माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याच्या वल्गना करीत आहेत. भाजपकडे बक्कळ पैसा जमा असल्यानेच ते मध्यावधीच्या बाता करीत आहेत. परंतु, कर्जमुक्तीला फाटा देण्याचे त्यांचे हे षडयंत्र शिवसेना हाणून पाडेल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती न मिळाल्यास राजकीय भूकंप ठरलेलाच आहे, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शेगाव येथे दिला. संतनगरी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले असता पत्रपरिषदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून शासनावर टीका केली.
राज्य सरकारने तत्त्वत: कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे सरसकट कर्जमुक्तीसाठी भाजप सरकारला सदबुद्धी मिळावी. शिवाय, राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, असे साकडे संत गजानन महाराजांच्या चरणी घातल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. नाशिक येथे कृषी अधिवेशन घेवून ‘मी कर्जमुक्त होणारच’ ही घोषणा केली. हे अभियान आजही सुरूच आहे. सत्तेत असो वा नसो, शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार शेतकऱ्यांसोबत शिवसेनेने उघडपणे पाठींबा देत संपात सहभाग घेतला. संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत हा लढा सुरूच राहील. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांसोबतच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारने ‘तत्त्वत: सरसकट’ला मान्यता दिली. त्यामुळे निकष वगैरे काय ठरवायचे ते त्यांना ठरवू देत. सातबारा मात्र कोरा झालाच पाहिजे. कर्जमुक्तीने आत्महत्यांचा प्रश्न सुटणार नसल्याचे भाजप ओरडून सांगते. मग प्राथमिक उपचार न करताच शेतकऱ्यांना मरू द्यायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करून आधी कर्जमुक्तीचा दिलासा आणि नंतर पुढील दूरगामी उपाययोजना आखा, असा सल्लाही यावेळी त्यांनी सरकारला दिला.
भाजप मध्यवधी निवडणुकीला तयार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका माडताना ते म्हणाले, भाजप कर्जमुक्तीच्या विरोधात होती. शिवसेनेच्या आणि शेतकरी एकजुटीच्या आंदोलनाने पायाखालची वाळू सरकत चाललेल्या मुख्यमंत्र्यांनी नमते घेतले. मंत्रिगटाच्या चर्चेत काय ती घोषणा झाली. आता याला मध्यावधीच्या नावाखाली फाटा देण्याचा डाव आखणाऱ्या भाजपचा मनसुबा शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी बक्कळ पैसा असल्यानेच ते मध्यावधीचे म्हणतात. त्यापेक्षा असलेला पैसा शेतकऱ्यांना द्या. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी न झाल्यास राजकीय भूकंप होईलच, असे संकेत ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दिले.
पत्रपरिषदेला मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्यासह खासदार प्रतापराव जाधव, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार भावना गवळी, खासदार अरविंद सावंत, शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, दत्ता पाटील, माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते.