म. टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यभरात सर्व सरकारी कार्यालयांवर ध्वजारोहण करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीही या नियमात येतात. पण, रविवारी बुटीबोरी ग्रामपंचायतीत ध्वजारोहणच करण्यात आले नसल्याचे खळबळजनक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र दिन असल्यामुळे काही गावकरी ध्वजारोहणासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पोहचले. परंतु काहीही तयारी दिसून आली नाही. शिवाय ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुपही होते. यादरम्यान जिल्हा परषिद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजतादरम्यान शिपायाने ग्रामपंचायत कार्यालय उघडले.
गावकऱ्यांनी ध्वजारोहण न करण्याविषयी विचारणा केली. पण, त्याने हा प्रश्न टोलवून लावत वरिष्ठांना विचारण्याचा सल्ला दिला. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी सचिव राघोर्ते यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. स्वातंत्र्यदिन, प्रजास्त्ताकदिन व महाराष्ट्र दिनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करणे बंधकारक आहे. तर या प्रकरणाची कोणतीही तक्रार करण्यात न आल्याने कारवाई कशी करणार, असे बुटीबोरीचे ठाणेदार भरत ठाकरे यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा नियम असतानाही करण्यात न आल्याने विदर्भ आंदोलनाला छुपा पाठिंबा तर नाही, अशी चर्चा रंगली आहे.
हिंदी विश्वविद्यालयात महाराष्ट्र दिन
वर्धा : महाराष्ट्र हे साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक प्रगतीत अग्रेसर राज्य राहिले आहे. अशा राज्यात महात्मा गांधी यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय असणे हे गौरवास्पद आहे, असे मत प्र-कुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा यांनी केले. विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यभरात सर्व सरकारी कार्यालयांवर ध्वजारोहण करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीही या नियमात येतात. पण, रविवारी बुटीबोरी ग्रामपंचायतीत ध्वजारोहणच करण्यात आले नसल्याचे खळबळजनक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र दिन असल्यामुळे काही गावकरी ध्वजारोहणासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पोहचले. परंतु काहीही तयारी दिसून आली नाही. शिवाय ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुपही होते. यादरम्यान जिल्हा परषिद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजतादरम्यान शिपायाने ग्रामपंचायत कार्यालय उघडले.
गावकऱ्यांनी ध्वजारोहण न करण्याविषयी विचारणा केली. पण, त्याने हा प्रश्न टोलवून लावत वरिष्ठांना विचारण्याचा सल्ला दिला. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी सचिव राघोर्ते यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. स्वातंत्र्यदिन, प्रजास्त्ताकदिन व महाराष्ट्र दिनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करणे बंधकारक आहे. तर या प्रकरणाची कोणतीही तक्रार करण्यात न आल्याने कारवाई कशी करणार, असे बुटीबोरीचे ठाणेदार भरत ठाकरे यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा नियम असतानाही करण्यात न आल्याने विदर्भ आंदोलनाला छुपा पाठिंबा तर नाही, अशी चर्चा रंगली आहे.
हिंदी विश्वविद्यालयात महाराष्ट्र दिन
वर्धा : महाराष्ट्र हे साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक प्रगतीत अग्रेसर राज्य राहिले आहे. अशा राज्यात महात्मा गांधी यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय असणे हे गौरवास्पद आहे, असे मत प्र-कुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा यांनी केले. विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.