अ‍ॅपशहर

१०वी परीक्षेला निघालेल्या ३ विद्यार्थिनींना कारने उडवले; १ ठार

दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने उडवले. यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ आज हा अपघात झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Mar 2020, 12:13 pm
गोंदिया: दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने उडवले. यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ आज हा अपघात झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम car rammed students


राज्यात ४ वर्षांत ६००० सायबर गुन्हेगार जाळ्यात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; कारचा चुराडा

दहावीची आजपासून परीक्षा सुरू झाली आहे. तीन विद्यार्थिनी परीक्षेसाठी केंद्रावर जात होत्या. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ सकाळी दहाच्या सुमारास एका भरधाव कारनं या तीन विद्यार्थिनींना उडवले. यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघी जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. तसंच संतप्त जमावानं काही वेळ रास्ता रोको केला. कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

लघवीसाठी रस्त्याच्या बाजूला थांबले असताना ट्रकनं चिरडलं!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज