म.टा. प्रतिनिधी, नागपूर
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला अजून तीन वर्षे लागणार असून, २०२०पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल. स्मारकासाठीची संपूर्ण साडेबारा एकर जागा सरकारला हस्तांतरित करण्यात आली असून, बांधकामालासुद्धा सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या निर्माणकार्यात होत असलेल्या विलंबाबाबत आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. प्रॉपर्टी कार्डावरसुद्धा सरकारचे नाव नोंदविण्यात आले आहे. सर्व नकाशे मंजूर झाले असून जोत्यापर्यंतच्या बांधकामाची परवानगी मिळाली आहे. सीआरझेड क्षेत्राबाहेरील जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी एमएमआरडीएने १५० कोटी रुपये दिले आहेत. या प्रकल्पासाठी पैशांची कमतरता भासणार नाही.'
या स्मारकासाठी आंदोलन केलेल्या प्रत्येक संघटनेशी, नेत्यांशी भेटून राजकुमार बडोले यांच्या समितीने आराखड्याची चर्चा केली आहे. सर्व आमदारांसमक्षही त्याचे सादरीकरण केले जाईल. हे काम पूर्ण करण्यास तीन वर्षांची मुदत आहे. २०२०पर्यंत काम पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकार मंद गतीने काम करीत आहे, असा आरोप यावेळी संजय दत्त यांनी केला. तर प्रकाश गजभिये यांनी नकाशे मंजूर नसताना काम होत नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावत, या मुद्द्यावर राजकारण न करता एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला अजून तीन वर्षे लागणार असून, २०२०पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल. स्मारकासाठीची संपूर्ण साडेबारा एकर जागा सरकारला हस्तांतरित करण्यात आली असून, बांधकामालासुद्धा सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या निर्माणकार्यात होत असलेल्या विलंबाबाबत आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. प्रॉपर्टी कार्डावरसुद्धा सरकारचे नाव नोंदविण्यात आले आहे. सर्व नकाशे मंजूर झाले असून जोत्यापर्यंतच्या बांधकामाची परवानगी मिळाली आहे. सीआरझेड क्षेत्राबाहेरील जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी एमएमआरडीएने १५० कोटी रुपये दिले आहेत. या प्रकल्पासाठी पैशांची कमतरता भासणार नाही.'
या स्मारकासाठी आंदोलन केलेल्या प्रत्येक संघटनेशी, नेत्यांशी भेटून राजकुमार बडोले यांच्या समितीने आराखड्याची चर्चा केली आहे. सर्व आमदारांसमक्षही त्याचे सादरीकरण केले जाईल. हे काम पूर्ण करण्यास तीन वर्षांची मुदत आहे. २०२०पर्यंत काम पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकार मंद गतीने काम करीत आहे, असा आरोप यावेळी संजय दत्त यांनी केला. तर प्रकाश गजभिये यांनी नकाशे मंजूर नसताना काम होत नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावत, या मुद्द्यावर राजकारण न करता एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.