पंकज मोहरीर, चंद्रपूर
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी १९४२मध्ये ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर चिमुरात मोठे आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते. या ऐतिहासिक घटनेस सोमवार, १४ ऑगस्ट ७५ वर्षे पूर्ण होत असून चिमूरची ही ‘ऑगस्ट क्रांती’ आजही स्वातंत्र्य लढ्याचा देदिप्यमान इतिहास जागवत आहे.
गांधीजींनी १९४२मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा दिल्यानंतर इंग्रजांविरुद्धचा असंतोष सत्याग्रह रूपाने चळवळ, उपोषण आणि क्रांती आंदोलन, अशा विविध आंदोलनांनी व्यक्त होत होता. धर्म, जात, पंथ तसेच आपापसातील मतभेद विसरून चिमूर येथील लोकांनी एक होत आपल्यातील लढवय्येपणाचे तेज प्रगट केले. ‘चले जाव’ आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली.
आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. चिडलेल्या लोकांनी १६ ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी विश्रामगृहाला आग लावली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा गोळीबार केल्यामुळे अनेकजण शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून संपूर्ण जगाला कळविले होते. चिमूर आजही या इतिहासाची साक्ष देत आहे.
स्वातंत्र्यलढ्याच्या त्या घटनांकडे दुर्लक्षच
ऑगस्ट हा क्रांतीचा महिना आहे. विदर्भातील अनेक मोठ्या घटना याच महिन्यातील आहेत. पण या घटनांकडे सदैव दुर्लक्षच झाले. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, वर्धा जिल्ह्यातील आष्टी, अमरावती जिल्ह्यातील यावली येथील स्वातंत्र्यसंग्राम इतिहासात अजरामर आहे. पण त्याची पाहिजे तशी दखल इतिहासकारांनी घेतलेली नाही, अशी खंत जाणकार व्यक्त करतात. चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्यलढ्यातील इतिहास सांगते. पण, या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने नव्या पिढीसमोर हा इतिहास प्रभावीपणे येऊ शकला नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी १९४२मध्ये ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर चिमुरात मोठे आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते. या ऐतिहासिक घटनेस सोमवार, १४ ऑगस्ट ७५ वर्षे पूर्ण होत असून चिमूरची ही ‘ऑगस्ट क्रांती’ आजही स्वातंत्र्य लढ्याचा देदिप्यमान इतिहास जागवत आहे.
गांधीजींनी १९४२मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा दिल्यानंतर इंग्रजांविरुद्धचा असंतोष सत्याग्रह रूपाने चळवळ, उपोषण आणि क्रांती आंदोलन, अशा विविध आंदोलनांनी व्यक्त होत होता. धर्म, जात, पंथ तसेच आपापसातील मतभेद विसरून चिमूर येथील लोकांनी एक होत आपल्यातील लढवय्येपणाचे तेज प्रगट केले. ‘चले जाव’ आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली.
आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. चिडलेल्या लोकांनी १६ ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी विश्रामगृहाला आग लावली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा गोळीबार केल्यामुळे अनेकजण शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून संपूर्ण जगाला कळविले होते. चिमूर आजही या इतिहासाची साक्ष देत आहे.
स्वातंत्र्यलढ्याच्या त्या घटनांकडे दुर्लक्षच
ऑगस्ट हा क्रांतीचा महिना आहे. विदर्भातील अनेक मोठ्या घटना याच महिन्यातील आहेत. पण या घटनांकडे सदैव दुर्लक्षच झाले. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, वर्धा जिल्ह्यातील आष्टी, अमरावती जिल्ह्यातील यावली येथील स्वातंत्र्यसंग्राम इतिहासात अजरामर आहे. पण त्याची पाहिजे तशी दखल इतिहासकारांनी घेतलेली नाही, अशी खंत जाणकार व्यक्त करतात. चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्यलढ्यातील इतिहास सांगते. पण, या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने नव्या पिढीसमोर हा इतिहास प्रभावीपणे येऊ शकला नाही.