नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात परत एकदा पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस काही ठिकाणी वादळी पाऊसही झाला. संत्रानगरीतही अधूनमधून हलक्याफुलक्या सरी बरसत आहेत. मात्र, बुधवारपासून नागपुरातील वातावरण कोरडे होण्याची आशा हवामान खात्याला आहे. गेल्या आठवड्यात वर्धा, वाशीम, यवतमाळ, अकोला बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी तर नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. नागपुरात मंगळवारपर्यंत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. बुधवारपासून हवामान परत एकदा कोरडे होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यात उत्तरेकडे परत एकदा पश्चिमी विक्षोपामुळे ढगाळ वातावरण आणि पाऊस झाला आहे. याचा परिणाम राजस्थानपर्यंत झाला आहे. राजस्थानातील हा चक्रावात बिहारकडे सरकत आहे. यादरम्यान उत्तर मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात फारशा पावसाची शक्यता नाही, असा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
उद्यापासून होणार मोकळे आकाश
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात परत एकदा पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस काही ठिकाणी वादळी पाऊसही झाला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2020, 4:00 am