अ‍ॅपशहर

‘राजकारण बंद करा’

मटा...

Maharashtra Times 15 Dec 2018, 4:00 am

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

राफेल विमान खरेदी कराराबाबत विरोधी पक्षांनी लावलेले सर्व आरोप खोटे होते, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता देशहितासाठी तरी या मुद्याचे राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला. गडकरी म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी राफेल विमान खरेदी आवश्यक होती. त्यानुसार केंद्राने करार केला. मात्र, विरोधी पक्षाने विमानांच्या किंमतीवरून रान उठवले. किंमत बरोबर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आता विरोधकांनी आरोपांना विराम देऊन राजकारण बंद करावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज