म.टा. प्रतिनिधी, नागपूर
घरात पाळणा हलण्याचे संकेत मिळाले तर अख्खे कुटुंब नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आसुसलेले असते. रांगणाऱ्या, अडखळणाऱ्या धडपडणाऱ्या पायाने सुख समाधान नव्याने उभे राहत असते. पण जगाच्या पाठीवरील असे अनेक कुटुंब आहेत ज्यांना मूल जन्माला आल्यानंतरही हे सुख दुरावते की काय अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. हाताची हाडे एकमेकांमध्ये गुंतवणारा असाच एक आजार म्हणजे कंजनायटल रेडिओ अल्नार सीनोस्टोसिस. हे अपंगत्व घेऊन लाखात एक मूल जन्माला येते. मात्र त्यावर वेळीच उपचार केले तर अशा मुलांमधील भविष्यातील अपंगत्व दूर करता येते याचे बळ नागपूरने जगातल्या वैद्यकीय क्षेत्राला दिले आहे.
हा उपचार शोधून काढणारे आणि त्याचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश करायला लावणारे डॉक्टर म्हणजे बाल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. वीरज शिंगाडे. अशा अपंगत्वावर पूर्वी ठोस असा उपचार वैद्यकीय शास्त्रात नव्हता. मात्र या अपंगत्वाशी झुंजणाऱ्या मुलांवर पहिली शस्त्रक्रिया डॉ. शिंगाडे यांच्या डॉ. रश्मी शिंगाडे, डॉ. सुरेश उघडे यांच्या टीमने यशस्वीपणे शोधली आहे. आता त्या मुलाना त्याचे दैनंदिन कामे सुरळीतपणे करता येत आहेत. इतकेच नाही तर जगभरातल्या बाल अस्थिरोग शास्त्रात प्रकाशित झालेल्या त्यांच्या या शोध निबंधाची दखल घेऊन वैद्यकीय शास्त्राने या उपचार पद्धतीचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेशदेखील केला आहे. नागपूरसाठी आणखी सुवर्णाक्षरात नोंद घेतली जावी अशी बाब म्हणजे या शल्यक्रियेच्या माध्यमातून गेल्या १४ वर्षांच जगभरातून १७६ मुलांची भविष्यातील अपंगत्वाच्या जोखडातून मुक्ती झाली आहे.
विशेष म्हणजे जगभर या आजाराविषयी आणि त्यावर आता उपलब्ध असलेल्या उपचाराविषयी जागृती करण्यासाठी दरवर्षी २४ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय रेडिओ अलनार सायनोस्टोसिस जागरूकता दिवस पाळला जातो. त्या अनुषंगाने साधलेल्या संवादात डॉ. शिंगाडे म्हणाले, हा आजार अतिशय दुर्लक्षित आहे. वेळीच उपचार मिळाला तर मुलांना भविष्यातील अपंगत्व आणि नैराश्यापासून वाचविता येते. आरोग्यसेवकांमधे सुद्धा या आजारासंबंधी माहिती नाही. यावर उपचार नाही असेच ते सांगतात. त्यामुळे अपंगत्व कायम राहाते. वास्तविक हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे चिल्ड्रन ऑर्थोपेडिक केअर इन्स्टिट्यूट आणि नागाई नारायणजी मेमोरियल फाउंडेशन रिसर्च विंग गेल्या अनेक वर्षांपासून मिशन राबवत आहे. फिजिओथेरपिस्ट डॉ. अल्पना मुळे, प्रियंका मंगरुलकर, संदीप निमजे, संजय इंगळे अशी टीमच त्यासाठी झटत असते.
आजाराचे प्रमाण
जन्माला येणाऱ्या एक लाख बालकांपैकी एकाला या आजार होऊ शकतो, असे अभ्यासातल्या नोंदी म्हणतात. त्या सरासरीने भारतामधे जवळ जवळ म्हणजे १३,००० अशी बालके आहेत आणि संपुर्ण जगामधे लाखाहुन अधिक बालके या आजाराने ग्रस्त आहे.
घरात पाळणा हलण्याचे संकेत मिळाले तर अख्खे कुटुंब नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आसुसलेले असते. रांगणाऱ्या, अडखळणाऱ्या धडपडणाऱ्या पायाने सुख समाधान नव्याने उभे राहत असते. पण जगाच्या पाठीवरील असे अनेक कुटुंब आहेत ज्यांना मूल जन्माला आल्यानंतरही हे सुख दुरावते की काय अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. हाताची हाडे एकमेकांमध्ये गुंतवणारा असाच एक आजार म्हणजे कंजनायटल रेडिओ अल्नार सीनोस्टोसिस. हे अपंगत्व घेऊन लाखात एक मूल जन्माला येते. मात्र त्यावर वेळीच उपचार केले तर अशा मुलांमधील भविष्यातील अपंगत्व दूर करता येते याचे बळ नागपूरने जगातल्या वैद्यकीय क्षेत्राला दिले आहे.
हा उपचार शोधून काढणारे आणि त्याचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश करायला लावणारे डॉक्टर म्हणजे बाल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. वीरज शिंगाडे. अशा अपंगत्वावर पूर्वी ठोस असा उपचार वैद्यकीय शास्त्रात नव्हता. मात्र या अपंगत्वाशी झुंजणाऱ्या मुलांवर पहिली शस्त्रक्रिया डॉ. शिंगाडे यांच्या डॉ. रश्मी शिंगाडे, डॉ. सुरेश उघडे यांच्या टीमने यशस्वीपणे शोधली आहे. आता त्या मुलाना त्याचे दैनंदिन कामे सुरळीतपणे करता येत आहेत. इतकेच नाही तर जगभरातल्या बाल अस्थिरोग शास्त्रात प्रकाशित झालेल्या त्यांच्या या शोध निबंधाची दखल घेऊन वैद्यकीय शास्त्राने या उपचार पद्धतीचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेशदेखील केला आहे. नागपूरसाठी आणखी सुवर्णाक्षरात नोंद घेतली जावी अशी बाब म्हणजे या शल्यक्रियेच्या माध्यमातून गेल्या १४ वर्षांच जगभरातून १७६ मुलांची भविष्यातील अपंगत्वाच्या जोखडातून मुक्ती झाली आहे.
विशेष म्हणजे जगभर या आजाराविषयी आणि त्यावर आता उपलब्ध असलेल्या उपचाराविषयी जागृती करण्यासाठी दरवर्षी २४ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय रेडिओ अलनार सायनोस्टोसिस जागरूकता दिवस पाळला जातो. त्या अनुषंगाने साधलेल्या संवादात डॉ. शिंगाडे म्हणाले, हा आजार अतिशय दुर्लक्षित आहे. वेळीच उपचार मिळाला तर मुलांना भविष्यातील अपंगत्व आणि नैराश्यापासून वाचविता येते. आरोग्यसेवकांमधे सुद्धा या आजारासंबंधी माहिती नाही. यावर उपचार नाही असेच ते सांगतात. त्यामुळे अपंगत्व कायम राहाते. वास्तविक हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे चिल्ड्रन ऑर्थोपेडिक केअर इन्स्टिट्यूट आणि नागाई नारायणजी मेमोरियल फाउंडेशन रिसर्च विंग गेल्या अनेक वर्षांपासून मिशन राबवत आहे. फिजिओथेरपिस्ट डॉ. अल्पना मुळे, प्रियंका मंगरुलकर, संदीप निमजे, संजय इंगळे अशी टीमच त्यासाठी झटत असते.
आजाराचे प्रमाण
जन्माला येणाऱ्या एक लाख बालकांपैकी एकाला या आजार होऊ शकतो, असे अभ्यासातल्या नोंदी म्हणतात. त्या सरासरीने भारतामधे जवळ जवळ म्हणजे १३,००० अशी बालके आहेत आणि संपुर्ण जगामधे लाखाहुन अधिक बालके या आजाराने ग्रस्त आहे.