नागपूर : जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून शहरातील कॉटन मार्केट सुरू ठेवण्यात आले होते. पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत येथे विक्री व व्यवसाय होत होता. मात्र येथे होणारी गर्दी पाहता व नागरिक एकमेकांत अंतर ठेवत नसल्याने मनपाने हा बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यापासून कॉटन मार्केटमध्ये कोणताही व्यवसाय करता येणार नाही. शहराच्या मध्यभागी हा बाजार आहे. ग्रामीण भागांसह मध्य प्रदेशातूनही येथे भाजीपाला येतो. त्यामुळे शहरातील अनेक विक्रेते पहाटेपासूनच येथे गर्दी करतात. किरकोळ बाजाराच्या तुलनेत येथे भाजीपालर स्वस्त मिळत असल्याने सामान्य नागपूरकरही येथे येतात. परंतु करोनामुळे ही गर्दी धोक्याची ठरू शकते. हे शक्ता पाहता मनपाने हा बाजार बंद केला आहे. त्यामुळे यया बाजारात काम करणा छत्तीसगडी मजुरांनाही आता घरीच राहावे लागणार आहे. आता या बाजारातील मालवाहतूक शहराच्या इतर भागात वळविण्यात येणार आहे.
गर्दीमुळे कॉटन मार्केट बंद
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून शहरातील कॉटन मार्केट सुरू ठेवण्यात आले होते पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत येथे विक्री व व्यवसाय होत होता...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2020, 4:00 am