आतापर्यंत आढळले २०९ रुग्ण म. टा. प्रतिनिधी, नागपूर शहर आणि जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे स्क्रब टायफसपासून तर मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा उद्रेक आलटून पालटून सुरूच आहे. जानेवारीपासून तर आतापर्यंत शहरात २०९ जणांना डेंग्यूच्या डासांनी डंख मारल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात १८५ डेंग्यूग्रस्त आढळले आहेत. शहरात साथीच्या आजारावर नियंत्रणाची तसेच उपचाराची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु, शहरात केवळ डेंग्यूच्या अळ्यांची शोधमोहीम सुरू आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाजवळ प्रभावी उपचाराची यंत्रणा नसल्यामुळे डेंग्यूचा उद्रेक दिसून येत आहे. डेंग्यूचा उद्रेक होत असताना खासगी रुग्णालयांनी डेंग्यूच्या चाचण्यांतून लूट सुरू केली आहे. डासअळ्या सापडल्यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा महापालिका देत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात २५ जणांना डेंग्यूचा ताप आला असल्याची माहिती पुढे आली होती. त्यावेळी यावर्षीही डेंग्यूचा डंख कायम असल्याचे सुतोवाच माध्यमांनी केले होते. यानंतर थेट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डेंग्यूचा शहरात उद्रेक झाल्याचे दोन्ही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते.
उपराजधानीत डेंग्यूचा डंख कायम
आतापर्यंत आढळले २०९ रुग्णम टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2019, 4:00 am