म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर
आजची युवा पिढी कम्प्युटरचा वापरी करीत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने विकासाची वाट चालत आहे. बौद्ध धर्मातील तत्वज्ञानालाही विज्ञानाची जोड आहे. धम्मातील हे सायन्सच युवांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामुळे जगात शांतता लाभेल, असा विश्वास अरुणाचल प्रदेशवरून आलेले भन्ते डॉ. वण्णासामी यांनी व्यक्त केला.
क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात हजारो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. चंद्रपूरवासीयांसाठी हा ऐतिहासिक क्रांतीदिन. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो बांधवांना धम्मदीक्षा दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात ही ऐतिहासिक क्रांती घडून आली. या क्रांतीदिनापासून चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा करण्यात येतो. या ६१व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्यावतीने रविवारपासून दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा चंद्रपूर येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय परिसरातील दीक्षाभूमीवर झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्यासह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून विश्वशांती बंधुत्व प्रेरीत वाहनासह शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बौद्ध भन्ते, तसेच देश-परदेशातील बौद्ध व आंबेडकरी अभ्यासक प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्यात सहभागी होऊन डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन जाण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनुयायांच्या सुविधांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर मनपा, पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे.
मुख्य समारंभ आज
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज, सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर यांची उपस्थिती राहील.
पुस्तकांच्या स्टॉलवर ‘निळाई’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूक समाजात मानवमुक्तीचा हुंकार भरला. त्यांच्या विचारांनी प्रेरीत झालेला समाज व्यक्त होऊ लागला लिहू लागला. त्यामुळेच मानवी जगण्याचा अस्सल बाज व्यक्त करणारे दलित साहित्य चळवळीचा आत्मा ठरले आहे. दीक्षाभूमीवर येणारा डॉ. आंबेडकरांचा अनुयायी मानवतेचा संदेश देणारे एकतरी पुस्तक आपल्या सोबत घेऊन जातो. त्यामुळे येथील पुस्तकांच्या स्टॉलवर अनुयायांची मोठी गर्दी होती. पुस्तकासोबतच बुद्ध मूर्ती आणि गौतम बुद्ध गीतांच्या माध्यमातून क्रांतीचा संदेश देणारे सीडींच्या स्टॉलवर गर्दी दिसून येत होती.
आजची युवा पिढी कम्प्युटरचा वापरी करीत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने विकासाची वाट चालत आहे. बौद्ध धर्मातील तत्वज्ञानालाही विज्ञानाची जोड आहे. धम्मातील हे सायन्सच युवांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामुळे जगात शांतता लाभेल, असा विश्वास अरुणाचल प्रदेशवरून आलेले भन्ते डॉ. वण्णासामी यांनी व्यक्त केला.
क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात हजारो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. चंद्रपूरवासीयांसाठी हा ऐतिहासिक क्रांतीदिन. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो बांधवांना धम्मदीक्षा दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात ही ऐतिहासिक क्रांती घडून आली. या क्रांतीदिनापासून चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा करण्यात येतो. या ६१व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्यावतीने रविवारपासून दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा चंद्रपूर येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय परिसरातील दीक्षाभूमीवर झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्यासह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून विश्वशांती बंधुत्व प्रेरीत वाहनासह शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बौद्ध भन्ते, तसेच देश-परदेशातील बौद्ध व आंबेडकरी अभ्यासक प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्यात सहभागी होऊन डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन जाण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनुयायांच्या सुविधांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर मनपा, पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे.
मुख्य समारंभ आज
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज, सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर यांची उपस्थिती राहील.
पुस्तकांच्या स्टॉलवर ‘निळाई’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूक समाजात मानवमुक्तीचा हुंकार भरला. त्यांच्या विचारांनी प्रेरीत झालेला समाज व्यक्त होऊ लागला लिहू लागला. त्यामुळेच मानवी जगण्याचा अस्सल बाज व्यक्त करणारे दलित साहित्य चळवळीचा आत्मा ठरले आहे. दीक्षाभूमीवर येणारा डॉ. आंबेडकरांचा अनुयायी मानवतेचा संदेश देणारे एकतरी पुस्तक आपल्या सोबत घेऊन जातो. त्यामुळे येथील पुस्तकांच्या स्टॉलवर अनुयायांची मोठी गर्दी होती. पुस्तकासोबतच बुद्ध मूर्ती आणि गौतम बुद्ध गीतांच्या माध्यमातून क्रांतीचा संदेश देणारे सीडींच्या स्टॉलवर गर्दी दिसून येत होती.