अ‍ॅपशहर

सलाम! मुसळधार पाऊस, रस्त्यात चिखल; तरीही गर्भवतीसाठी १७ किमी बाईकवरून गेले डॉक्टर

गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावातील गर्भवतीवर उपचार करण्यासाठी एका डॉक्टरांनी १७ किलो अंतर दुचाकीवरून कापलं. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे चिखलानं भरलेले रस्ते अशा परिस्थितीत डॉक्टरांनी प्रवास केला. डॉक्टरांच्या या कर्तव्यनिष्ठेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2022, 5:45 pm
नागपूर: गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावातील गर्भवतीवर उपचार करण्यासाठी एका डॉक्टरांनी १७ किलो अंतर दुचाकीवरून कापलं. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे चिखलानं भरलेले रस्ते अशा परिस्थितीत डॉक्टरांनी प्रवास केला. डॉक्टरांच्या या कर्तव्यनिष्ठेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. नितेश वड्डे असं या डॉक्टरांचं नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur doctor
डॉक्टरांचा भरपावसात १७ किमी प्रवास


पूर्व विभागाला सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यामुळे कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये याची काळजी आरोग्य विभागाचे कर्मचारी घेत आहेत. नितेश वड्डे हे गट्टा येथील पेरिमिली आरोग्य केंद्रात (पीएचसी) कार्यरत आहेत. एटापल्लीमधील धोतुपतोला येथील गर्भवतीला मलेरियाची लागण झाली होती. तिला आरोग्य केंद्रात येणं शक्य नव्हतं. त्यामुळे डॉ. वड्डे महिलेच्या गावात बाईकनं पोहोचले.
VIDEO: विक्रेत्यानं चक्क नाल्यात धुतली भाजी; धक्कादायक प्रकार पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
डॉ. वड्डे वेळेत पोहोचल्यानं गर्भवतीचा जीव वाचला. वड्डेंनी महिलेला इंजेक्शन दिलं, अशी माहिती जिल्हा आरोग्य कर्मचारी डॉ. धवल साळवे यांनी दिली. सिरोंचामधील ८ आणि इतर गावांतील १७ गर्भवतींना पीएचसीमधील माहेरघरमध्ये दाखल करून घेण्यात आल्याचंही साळवेंनी सांगितलं. सहा डॉक्टरांचा आणि ३४ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली चार पथकं अहेरी आणि सिरोंचामधील आजारी ग्रामस्थांवर उपचार करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहेत. पाण्यातून होणाऱ्या आजारांबद्दलच्या जनजागृतीसाठी आणि उपचारांसाठी ही पथकं काम करत असल्याचं साळवे म्हणाले.
भावंडांशी भेट, गाण्याचा सराव; दोनच दिवसात अक्षयच्या आत्महत्येनं माटेगावकर कुटुंबाला धक्का
बचाव पथकांच्या मदतीनं पूरग्रस्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न वैद्यकीय पथकं करत आहेत. औषधांचा साठा असलेले ट्रक्स गावांपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं साळवे म्हणाले. पुराचा फटका वाहतुकीला बसलेला आहे. अनेक भागांशी असलेला संपर्क तुटला आहे. मात्र याचा परिणाम आरोग्य सेवांवर होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितलं. गर्भवती महिला उपचारांपासून वंचित राहू नयेत. दूषित पाण्यामुळे होणारे आजार त्यांना होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जात असल्याचं मीणा म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज