म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
मनपाच्या जुना सुभेदार लेआऊट येथील शाळेचा परिसर रात्रीच्या वेळी असमाजिक तत्त्वांचा अड्डा बनला असून, दारूड्यांचा मोठा वावर असतो. शाळेला दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत सुटी असल्याने मद्यपींची मोठ्या संख्येत येथे चंगळ असते. आता ही नित्याचीच बाब झाली असून, दारुड्यांसोबतच गांजा पिणाऱ्यांनीही येथे हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. अधूनमधून असे प्रकार येथे सुरूच आहेत. परिसरातील नागरिक समितीने शाळेच्या पालकत्वाची मागणी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने आज परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
सायंकाळनंतर रात्रभर येथे चौकीदार नसतो. त्यामुळे मैदानात असलेल्या पायऱ्यांवर बसून असामाजिक तत्त्व आपले व्यसन पूर्ण करून घ्यायचे. दारू, गांजा प्यायचे. नागरिकांनी अशा प्रवृत्तींना विरोध केल्यानंतर काही काळ असा प्रकार बंद पडला. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर जीर्ण पायऱ्या तोडण्यात आल्या. आता मद्यपी मैदानात असलेल्या जीर्ण स्टेडिअमवर बसून किंवा शाळेच्या पायरीवर बसून मद्यपान करतात. दारूच्या बाटल्या मैदानातच फेकतात तसेच परिसरात हैदोस घालतात. नागरिकांनी शाळेच्या पालकत्वाकडे चौकीदाराची मागणी केली होती. पण, प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. मध्यंतरी नागरिकांनी स्वत: शाळेच्या गेटची चावी शाळा प्रशासनाकडून मागून घेत जबाबदारी घेतली होती. त्यामुळे अशा प्रकारांवर काही प्रमाणात आळा बसला होता. पण, स्थानिक राजकारण्यांनी दबाव टाकून शाळेला नागरिकांकडून चाव्या परत घ्यावयास लावल्या. त्यामुळे परत असे प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांच्या मदतीने असे सर्व प्रकार बंद व्हावेत, यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत. एवढेच काय तर, असामाजिक तत्त्वांनी मैदानातील एक गेटही तोडले आहे. यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना मैदानात असुरक्षित वाटत आहे. शाळा व मनपा प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी जुना सुभेदार लेआऊट(एक्स्टेंशन) येथील नागरिकांनी केली आहे.
मनपाच्या जुना सुभेदार लेआऊट येथील शाळेचा परिसर रात्रीच्या वेळी असमाजिक तत्त्वांचा अड्डा बनला असून, दारूड्यांचा मोठा वावर असतो. शाळेला दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत सुटी असल्याने मद्यपींची मोठ्या संख्येत येथे चंगळ असते. आता ही नित्याचीच बाब झाली असून, दारुड्यांसोबतच गांजा पिणाऱ्यांनीही येथे हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. अधूनमधून असे प्रकार येथे सुरूच आहेत. परिसरातील नागरिक समितीने शाळेच्या पालकत्वाची मागणी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने आज परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.
सायंकाळनंतर रात्रभर येथे चौकीदार नसतो. त्यामुळे मैदानात असलेल्या पायऱ्यांवर बसून असामाजिक तत्त्व आपले व्यसन पूर्ण करून घ्यायचे. दारू, गांजा प्यायचे. नागरिकांनी अशा प्रवृत्तींना विरोध केल्यानंतर काही काळ असा प्रकार बंद पडला. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर जीर्ण पायऱ्या तोडण्यात आल्या. आता मद्यपी मैदानात असलेल्या जीर्ण स्टेडिअमवर बसून किंवा शाळेच्या पायरीवर बसून मद्यपान करतात. दारूच्या बाटल्या मैदानातच फेकतात तसेच परिसरात हैदोस घालतात. नागरिकांनी शाळेच्या पालकत्वाकडे चौकीदाराची मागणी केली होती. पण, प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. मध्यंतरी नागरिकांनी स्वत: शाळेच्या गेटची चावी शाळा प्रशासनाकडून मागून घेत जबाबदारी घेतली होती. त्यामुळे अशा प्रकारांवर काही प्रमाणात आळा बसला होता. पण, स्थानिक राजकारण्यांनी दबाव टाकून शाळेला नागरिकांकडून चाव्या परत घ्यावयास लावल्या. त्यामुळे परत असे प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांच्या मदतीने असे सर्व प्रकार बंद व्हावेत, यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत. एवढेच काय तर, असामाजिक तत्त्वांनी मैदानातील एक गेटही तोडले आहे. यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना मैदानात असुरक्षित वाटत आहे. शाळा व मनपा प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी जुना सुभेदार लेआऊट(एक्स्टेंशन) येथील नागरिकांनी केली आहे.