अ‍ॅपशहर

भाजपची लाकडं राजकीय स्मशानात रचली आणि आता..., संजय राऊतांची जळजळीत टीका

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला होता पण आता तो थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ही ईडी यापुढे कोणामागे लागेल असा सवाल विचारला असता, राऊतांनी भाजपवर गंभीर टीका केली आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2022, 11:27 am
नागपूर : आतापर्यंत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला होता पण आता तो थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ही ईडी यापुढे कोणामागे लागेल असा सवाल विचारला असता, भाजपला ज्यांच्यामागे जायचं आहे, त्यांनी जावं पण त्यांना मात्र स्मशानातच जावं लागणार आहे, अशी गंभीर टीका शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut news
sanjay raut news


भाजपने कोणाच्याही मागे ईडीच्या कारवाया लावल्या तरी त्यांची लाकडं ही राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. त्यांना लवकरच 'हे राम' म्हणावं लागेल असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खरंतर, मंगळवारी ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे बंधू तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे.

शरद पवारांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी
'शिवसेनेचं यश बघून लक्ष विचलित करण्यासाठी कारवाई'

दरम्यान, कालपासून शिवसंपर्क अभियान विदर्भ आणि मराठवाड्यात सुरु झालं. दुपारपर्यंत या कार्यक्रमाने वेग घेतला आणि तितक्यात या कारवाया सुरु झाल्या. त्यामुळे माझा दावा आहे की काल सकाळापासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली ते यश बघून लक्ष विचलित करण्यासाठी या कारवाया सुरू झाल्या, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, 'श्रीधर पाटणकारांना चौकशीसाठी बोलवायला पाहिजे. मालमत्ता जप्त करण्यापूर्वी चौकशीला का नाही बोलवलं. ही मनमानी आहे भाजप याचं समर्थन करत असून ही हुकूमशाहीची नांदी' असल्याचंही राऊत म्हणाले.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज