नागपूर : "ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका क्षणात सत्तेचं चित्र पालटवलं. मी पुन्हा येईनचा गजर करणारे फक्त पाहत बसले", असा टोला पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादीचे असलेले नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. "आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ, असं त्यांना वाटत होतं, पण त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला", असंही खडसे म्हणाले.
"मी पुन्हा येईन म्हणत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा आपल्यावरच येईन, असं काही जणांना वाटत होतं. राज्यात कुणाचंही आव्हान नाही. समोर कुणी पैलवानच दिसत नाही, असंही काहीजण म्हणत होते. पण तेल लावलेल्या पैलवानासमोर पुन्हा येईन म्हणणारे फक्त पाहत बसले," असा सणसणीत टोला खडसेंनी फडणवीस यांना लगावला. ते राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
"पवारांच्या प्रयत्नांमुळे राज्यात त्यांचं सरकार आलं नाही. त्याचीच सल मनात ठेऊन विरोधी पक्ष सतत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करतंय. सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल", अशा विश्वास खडसेंनी व्यक्त केला.
"विदर्भात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तरुणांचीही संख्या मोठी आहे. पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्यास विदर्भात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष होऊ शकतो. मात्र त्याआधी विदर्भातील नेत्याची पोकळी आधी भरुन काढावी लागेल", असं मतंही खडसेंनी व्यक्त केली.
"मी पुन्हा येईन म्हणत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा आपल्यावरच येईन, असं काही जणांना वाटत होतं. राज्यात कुणाचंही आव्हान नाही. समोर कुणी पैलवानच दिसत नाही, असंही काहीजण म्हणत होते. पण तेल लावलेल्या पैलवानासमोर पुन्हा येईन म्हणणारे फक्त पाहत बसले," असा सणसणीत टोला खडसेंनी फडणवीस यांना लगावला. ते राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
"पवारांच्या प्रयत्नांमुळे राज्यात त्यांचं सरकार आलं नाही. त्याचीच सल मनात ठेऊन विरोधी पक्ष सतत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करतंय. सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल", अशा विश्वास खडसेंनी व्यक्त केला.
"विदर्भात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तरुणांचीही संख्या मोठी आहे. पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्यास विदर्भात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष होऊ शकतो. मात्र त्याआधी विदर्भातील नेत्याची पोकळी आधी भरुन काढावी लागेल", असं मतंही खडसेंनी व्यक्त केली.