म.टा.प्रतिनिधी, नागपूर
बदललेल्या जीवनशैलीने दिलेले आजार, वाढती महागाई आणि त्याच्या जोडीने आलेला जीएसटी यामुळे नागपूरकरांचा दवाखाने आणि औषधांवरील होणारा खर्च वाढत चालला आहे. सततच्या धावपळीमुळे अनेक नागरिकांना थकवा जाणवत असून, त्यामुळे त्यांची कार्यक्षमताही कमी झाली असल्याचा दावा, नंदनवन येथील महिला महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपुरातील नागरिकांचे सर्वेक्षण आणि मुलाखती यातून हे तथ्य पुढे आले असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपुरातील नागरिकांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून महाविद्यालयाने अभ्यास केला आहे. महाल, नंदनवन, दिघोरी, सक्करदरा, मानेवाडा इत्यादी भागांतील कुटुंबांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. २०१६-१७ या कालावधीत सुमारे एक हजार लोकांचे सर्वेक्षण या अभ्यासादरम्यान करण्यात आले. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि विविध आर्थिक परिस्थितीतील व्यक्तींच्या आरोग्याचा, आजारांचा आणि त्यांच्या आरोग्यावरील खर्चाचा अंदाज या अभ्यासात घेण्यात आला आहे. या परिसरातील नागपूरकर आरोग्यावर किती खर्च करतात आणि पूर्वीपेक्षा त्यात कशी वाढ झाली आहे, हे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे, असे प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
ज्या नागरिकांचा अभ्यास करण्यात आला, त्यापैकी बहुतेकांचे मासिक उत्पन्न हे एक हजार ते दहा हजार रुपये आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचे दिसून आले आहेत. त्यापाठोपाठ थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखीनेही अनेक नागरिक त्रस्त आहेत. या आजारपणांचा रोजच्या कामावरही परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सर्वेक्षणादरम्यान सांगितले.
जीसटीच्या कारणांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे, औषधांवर दरमहा कराव्या लागणाऱ्या खर्चातही वाढ झाली असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. त्यामुळे, मध्यमवर्गीय कुटुंबांनाही औषधांसाठी जास्त तरतूद करावी लागत आहे. सरकारी दवाखान्यांपेक्षा खासगी दवाखान्यांमध्ये चांगले उपचार मिळत असल्याची बहुतांश नागरिकांची भावना आहे. या दवाखान्याच्या खर्चापोटी नागरिकांना मोठी रक्कम खर्ची घालावी लागत आहेत.
अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्राची देशपांडे, प्रा.प्रणया पाटील, प्रा. नीलम हेडाऊ, प्रा. प्रज्ञा राऊत आणि प्रा. नूतन माकुमे, स्वाती खोडे, दीक्षा साखरकर, रुचिका रणदिवे, कोमल शाहू, दीक्षा क्षीरसागर, पूर्वेशी सेलोटे, अंजली शहाणे, दीक्षा गेडाम, श्रद्धा आनदेव आणि रीना ठाकरे यांनी या अभ्यासात सहभाग घेतला होता.
सर्वेक्षणातील ठळक मुद्दे
सत्तर टक्के लोकांचा नाही आरोग्य विमा.
गर्भवती महिलांची तपासणी महागली.
घरगुती उपायांऐवजी दवाखान्यात जात असल्याने औषध खर्चात वाढ
डेंग्यू, चिकनगुनियाच्या तपासण्यांचा वाढला खर्च
आजाराने गंभीर स्वरुप घेईपर्यंत आरोग्याकडे दुर्लक्ष
डॉक्टरांच्या साखळीमुळे वाढला खर्च
बदललेल्या जीवनशैलीने दिलेले आजार, वाढती महागाई आणि त्याच्या जोडीने आलेला जीएसटी यामुळे नागपूरकरांचा दवाखाने आणि औषधांवरील होणारा खर्च वाढत चालला आहे. सततच्या धावपळीमुळे अनेक नागरिकांना थकवा जाणवत असून, त्यामुळे त्यांची कार्यक्षमताही कमी झाली असल्याचा दावा, नंदनवन येथील महिला महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपुरातील नागरिकांचे सर्वेक्षण आणि मुलाखती यातून हे तथ्य पुढे आले असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपुरातील नागरिकांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून महाविद्यालयाने अभ्यास केला आहे. महाल, नंदनवन, दिघोरी, सक्करदरा, मानेवाडा इत्यादी भागांतील कुटुंबांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. २०१६-१७ या कालावधीत सुमारे एक हजार लोकांचे सर्वेक्षण या अभ्यासादरम्यान करण्यात आले. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि विविध आर्थिक परिस्थितीतील व्यक्तींच्या आरोग्याचा, आजारांचा आणि त्यांच्या आरोग्यावरील खर्चाचा अंदाज या अभ्यासात घेण्यात आला आहे. या परिसरातील नागपूरकर आरोग्यावर किती खर्च करतात आणि पूर्वीपेक्षा त्यात कशी वाढ झाली आहे, हे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे, असे प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
ज्या नागरिकांचा अभ्यास करण्यात आला, त्यापैकी बहुतेकांचे मासिक उत्पन्न हे एक हजार ते दहा हजार रुपये आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचे दिसून आले आहेत. त्यापाठोपाठ थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखीनेही अनेक नागरिक त्रस्त आहेत. या आजारपणांचा रोजच्या कामावरही परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सर्वेक्षणादरम्यान सांगितले.
जीसटीच्या कारणांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे, औषधांवर दरमहा कराव्या लागणाऱ्या खर्चातही वाढ झाली असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. त्यामुळे, मध्यमवर्गीय कुटुंबांनाही औषधांसाठी जास्त तरतूद करावी लागत आहे. सरकारी दवाखान्यांपेक्षा खासगी दवाखान्यांमध्ये चांगले उपचार मिळत असल्याची बहुतांश नागरिकांची भावना आहे. या दवाखान्याच्या खर्चापोटी नागरिकांना मोठी रक्कम खर्ची घालावी लागत आहेत.
अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्राची देशपांडे, प्रा.प्रणया पाटील, प्रा. नीलम हेडाऊ, प्रा. प्रज्ञा राऊत आणि प्रा. नूतन माकुमे, स्वाती खोडे, दीक्षा साखरकर, रुचिका रणदिवे, कोमल शाहू, दीक्षा क्षीरसागर, पूर्वेशी सेलोटे, अंजली शहाणे, दीक्षा गेडाम, श्रद्धा आनदेव आणि रीना ठाकरे यांनी या अभ्यासात सहभाग घेतला होता.
सर्वेक्षणातील ठळक मुद्दे
सत्तर टक्के लोकांचा नाही आरोग्य विमा.
गर्भवती महिलांची तपासणी महागली.
घरगुती उपायांऐवजी दवाखान्यात जात असल्याने औषध खर्चात वाढ
डेंग्यू, चिकनगुनियाच्या तपासण्यांचा वाढला खर्च
आजाराने गंभीर स्वरुप घेईपर्यंत आरोग्याकडे दुर्लक्ष
डॉक्टरांच्या साखळीमुळे वाढला खर्च