यवतमाळ : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथील एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली. अशोक नामदेव डहाके (६५), असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. अशोक यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीने ते काळजीत राहात होते. यंदाही पिकांनी दगा दिल्याने बँकांचे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत असतानाच घराबाहेर पडले. दाराला बाहेरून कडी लावली. रात्री उशीरा वडील घरी नसल्याचे त्यांच्या मुलाच्या लक्षात आले. घराचे दार बाहेरून बंद असल्याने बाहेर पडता येत नव्हते. शेजारी राहणाऱ्या काकांना हाक मारून दार उघडले. सर्वांनी अशोक यांचा शोध घेतला असता विहिरीच्या काठावर त्यांना चपला आढळल्या. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या
सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथील एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...
Maharashtra Times 16 Dec 2018, 4:00 am