चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील सिरपूर येथील एका युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. चंद्रकांत गावतुरे (३०), असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांसोबत शेतावर गेलेले चंद्रकांत घरी परतले. त्यांच्यासाठी पत्नी कपडे आणण्यासाठी घरात गेली असतानाच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चार महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.
शेतकऱ्याची आत्महत्या
चिमूर तालुक्यातील सिरपूर येथील एका युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली...
Maharashtra Times 4 Oct 2018, 4:00 am