म.टा. प्रतिनिधी, नागपूरः यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. ऑगस्टअखेरीस काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु यामुळे जमिनीतील ओलावा अद्यापही कायम आहे. त्याचा सकारात्मक परिणाम रब्बीवर दिसू लागला आहे. खरिपात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. त्यामुळे आत्तपर्यंत रब्बीची ६० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरी किंवा त्याहूनही अधिक पावसाची नोंद केली जात आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामाकडून आशा वाढल्यात. गेल्या वर्षीही रब्बीची पेरणी वाढली होती. यंदाही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना रब्बीकडून आशा आहेत. जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात सहसा गहू, हरभरा, ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रब्बीचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्टर इतके आहे. गतवर्षी जिल्ह्यात रब्बीमध्ये कृषी विभागाने १.५५ लाख क्षेत्रावर नियोजन केले होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने रब्बीसाठी १ लाख ७७ हजार २०० हेक्टरचे नियोजन केले आहे. यंदा ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची तर ८६ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होणे अपेक्षित आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारी, मका आदींचा समावेश आहे.
हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार
गतवर्षी जिल्ह्यात नियोजित क्षेत्राच्या ७९ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. तर ७७ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. साधारणत: जिल्ह्यात मौदा, रामटेक या तालुक्यात रब्बीत गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असते. यंदा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जमिनीतही ओलावा आहे. त्यामुळे यंदाही हरभऱ्याची पेरणी गव्हाच्या तुलनेत अधिक होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
पिकांचे क्षेत्र (हेक्टर)
गहू : २६,१४३
हरभरा : ६३,९९०
ज्वारी : १८५
मका : १४५
जवस :२७
सूर्यफुल : १,०००
मोहरी : ३००
भाजीपाला : ३,८३९
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरी किंवा त्याहूनही अधिक पावसाची नोंद केली जात आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामाकडून आशा वाढल्यात. गेल्या वर्षीही रब्बीची पेरणी वाढली होती. यंदाही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना रब्बीकडून आशा आहेत. जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात सहसा गहू, हरभरा, ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रब्बीचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्टर इतके आहे. गतवर्षी जिल्ह्यात रब्बीमध्ये कृषी विभागाने १.५५ लाख क्षेत्रावर नियोजन केले होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने रब्बीसाठी १ लाख ७७ हजार २०० हेक्टरचे नियोजन केले आहे. यंदा ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची तर ८६ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होणे अपेक्षित आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारी, मका आदींचा समावेश आहे.
हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार
गतवर्षी जिल्ह्यात नियोजित क्षेत्राच्या ७९ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. तर ७७ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. साधारणत: जिल्ह्यात मौदा, रामटेक या तालुक्यात रब्बीत गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असते. यंदा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जमिनीतही ओलावा आहे. त्यामुळे यंदाही हरभऱ्याची पेरणी गव्हाच्या तुलनेत अधिक होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
पिकांचे क्षेत्र (हेक्टर)
गहू : २६,१४३
हरभरा : ६३,९९०
ज्वारी : १८५
मका : १४५
जवस :२७
सूर्यफुल : १,०००
मोहरी : ३००
भाजीपाला : ३,८३९