म. टा. वृत्तसेवा, वर्धा
बायर सायन्स सीडस् आणि कावेरी सीडस् या कंपन्यांनी आपल्या बीटी बियाण्यांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा करीत शेतकऱ्यांना विक्री केली होती. पण, ४५ दिवसांत बोंड अळीने कपाशी फस्त केली. याविरोधात देवळी तालुक्यातील विजय गोपाल येथील ३६ शेतकऱ्यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध कृषी अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. त्याआधारे देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्रातील ही पहिली घटना ठरली आहे.
विजयगोपाल येथील शेतकरी विजय महादेवराव पेटकर आणि अशोक उदयभान मारोटकर यांनी त्यांच्या शेतामध्ये बीटी बियाण्यांची लागवड केली होती. या कपाशीवर बोंड अळी येत नसल्याचा दावा कंपन्यांनी केला होता. परंतु अळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय परिसरातील श्रीकांत शिरे यांनीही त्यांच्या शेतात बीटी कपाशीची लागवड केली होती. पण, गुलाबी बोंड अळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केली आहे. परिसरातील सुमारे ३६हून अधिक शेतकऱ्यांची परिस्थिती याहून वेगळी नाही. म्हणून या शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्यांविरोधात जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली. जिल्हा बीज गुणनियंत्रक समितीच्या तपासात शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्याने वर्ध्याचे कृषी अधीक्षक यांनी बायर सायन्स सीडस् कंपनी आणि कावेरी सीडस् कंपनी यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार २० दिवसांपूर्वी देवळी पोलिसात दिली. मंत्रीमंडळाचे आदेश असताना दोन दिवसांपासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पोलिसांविषयी नाराजीचा सूर दिसून येत होता. अखेर पोलिस अधीक्षकांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आणि अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कृषिमूल्य आयोगा अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पाहणीतही पिकाचे वास्तव समोर आले होते.
शेतकऱ्यांचे भरून न निघणारे नुकसान
सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतर अवकाळी पावसाने नुकसान झाले. आता वातावरणातील बदलाने कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. काही कंपन्यांचे बियाणे चांगले निघाल्याने त्या कपाशीवर लाल बोंड अळी नाही. मात्र काही नॉन बीटी व हलक्या कंपनीच्या बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात अळी आल्याने कपाशीचे नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना यावेळी कपाशीवर मोठी आशा होती. मात्र निसर्गाने दगा दिला. त्यामुळे सरकारने मदत करून बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बोगस बियाण्यांची विक्री
वर्धा जिल्ह्यात सुमारे दीड लाख पाकीट बोगस बियाण्यांची विक्री करण्यात आल्याची चर्चा खरीप हंगामात होती. पण, याकडे कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बोगस बियाणे विक्रीवर नियंत्रण मिळविण्याचा देखावा करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
कंपन्यांचा दावा
बीटीवर ४५ दिवसांतच बोंड अळी आली आहे. ‘बीटी १’वर ९० तर ‘बीटी २’वर ११० दिवसांआधी बोंड अळी येणार नसल्याचा दावा कंपनीने केला होता. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील ३६ शेतकऱ्याने वेळेच्या आधी कपाशीवर बोंड अळी आल्याची तक्रार कृषी विभागाला केली आहे.
बायर सायन्स सीडस् आणि कावेरी सीडस् या कंपन्यांनी आपल्या बीटी बियाण्यांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा करीत शेतकऱ्यांना विक्री केली होती. पण, ४५ दिवसांत बोंड अळीने कपाशी फस्त केली. याविरोधात देवळी तालुक्यातील विजय गोपाल येथील ३६ शेतकऱ्यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध कृषी अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. त्याआधारे देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्रातील ही पहिली घटना ठरली आहे.
विजयगोपाल येथील शेतकरी विजय महादेवराव पेटकर आणि अशोक उदयभान मारोटकर यांनी त्यांच्या शेतामध्ये बीटी बियाण्यांची लागवड केली होती. या कपाशीवर बोंड अळी येत नसल्याचा दावा कंपन्यांनी केला होता. परंतु अळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय परिसरातील श्रीकांत शिरे यांनीही त्यांच्या शेतात बीटी कपाशीची लागवड केली होती. पण, गुलाबी बोंड अळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केली आहे. परिसरातील सुमारे ३६हून अधिक शेतकऱ्यांची परिस्थिती याहून वेगळी नाही. म्हणून या शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्यांविरोधात जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली. जिल्हा बीज गुणनियंत्रक समितीच्या तपासात शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्याने वर्ध्याचे कृषी अधीक्षक यांनी बायर सायन्स सीडस् कंपनी आणि कावेरी सीडस् कंपनी यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार २० दिवसांपूर्वी देवळी पोलिसात दिली. मंत्रीमंडळाचे आदेश असताना दोन दिवसांपासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पोलिसांविषयी नाराजीचा सूर दिसून येत होता. अखेर पोलिस अधीक्षकांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आणि अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कृषिमूल्य आयोगा अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पाहणीतही पिकाचे वास्तव समोर आले होते.
शेतकऱ्यांचे भरून न निघणारे नुकसान
सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतर अवकाळी पावसाने नुकसान झाले. आता वातावरणातील बदलाने कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. काही कंपन्यांचे बियाणे चांगले निघाल्याने त्या कपाशीवर लाल बोंड अळी नाही. मात्र काही नॉन बीटी व हलक्या कंपनीच्या बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात अळी आल्याने कपाशीचे नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना यावेळी कपाशीवर मोठी आशा होती. मात्र निसर्गाने दगा दिला. त्यामुळे सरकारने मदत करून बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बोगस बियाण्यांची विक्री
वर्धा जिल्ह्यात सुमारे दीड लाख पाकीट बोगस बियाण्यांची विक्री करण्यात आल्याची चर्चा खरीप हंगामात होती. पण, याकडे कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बोगस बियाणे विक्रीवर नियंत्रण मिळविण्याचा देखावा करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
कंपन्यांचा दावा
बीटीवर ४५ दिवसांतच बोंड अळी आली आहे. ‘बीटी १’वर ९० तर ‘बीटी २’वर ११० दिवसांआधी बोंड अळी येणार नसल्याचा दावा कंपनीने केला होता. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील ३६ शेतकऱ्याने वेळेच्या आधी कपाशीवर बोंड अळी आल्याची तक्रार कृषी विभागाला केली आहे.