म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर
ताडोब्यातील बफर भागासह इरई धरणालगतच्या जंगलात वणवा लागल्याची घटना सोमवारी समोर आली. यात सुमारे सात हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. चार तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. गेल्या वर्षी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर झोनमध्ये वणवा लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्या होत्या. त्यानंतरही खबरदारी घेण्यात न आल्याने हा वणवा लागल्याचा आरोप होत आहे.
वणवा पेटल्यानंतर बफरमधील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील एक हेक्टर तर इरई धरणालगतच्या जंगलात सहा हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. त्यावर वनविभागाच्या १३ जणांच्या चमूने आग नियंत्रणासाठी प्रयत्न केले. सकाळी ११ वाजता लागलेली आग दुपारी ३ वाजता आटोक्यात आली, अशी माहिती ताडोबा बफरच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. इरई धरण आणि अन्य पाणवठ्यावर मोठी जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात. या आगीतून मोठे प्राणी स्वतःची सुटका करून घेतात. मात्र छोटे प्राणी यात होरपळतात. पण, सोमवारच्या आगीत वन्यप्राणांना धोका झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ताडोब्यातील पळसगाव कोअर झोनमध्ये ११ मार्चला वणवा लागला होता. वनविकास महामंडळाच्या आग संरक्षण यंत्रणा पथकाने ताबडतोब आग विझविण्याचे काम केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडीच तास लागले होते. दरम्यान, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आग संरक्षण यंत्रणा सज्ज असून ५५ हजार १६२ हेक्टरवर वनवणवा नियंत्रण ठेवले गेले आहे. वनविकास महामंडळाच्या उत्तर चंद्रपूर विभागामार्फत ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनातील आगीचे संरक्षणाची कामे पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागामार्फत १६ फेब्रुवारी ते १५ जून या कालवधीत केली गेली. यंदाही वनविकास महामंडळामार्फत आधुनिक वनवणवा प्रतिबंधक प्रकल्पांतर्गत आग संरक्षणाची कामे राबविण्यात येत आहेत.
ताडोब्यातील बफर भागासह इरई धरणालगतच्या जंगलात वणवा लागल्याची घटना सोमवारी समोर आली. यात सुमारे सात हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. चार तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. गेल्या वर्षी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर झोनमध्ये वणवा लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्या होत्या. त्यानंतरही खबरदारी घेण्यात न आल्याने हा वणवा लागल्याचा आरोप होत आहे.
वणवा पेटल्यानंतर बफरमधील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील एक हेक्टर तर इरई धरणालगतच्या जंगलात सहा हेक्टर जंगल प्रभावित झाले आहे. त्यावर वनविभागाच्या १३ जणांच्या चमूने आग नियंत्रणासाठी प्रयत्न केले. सकाळी ११ वाजता लागलेली आग दुपारी ३ वाजता आटोक्यात आली, अशी माहिती ताडोबा बफरच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. इरई धरण आणि अन्य पाणवठ्यावर मोठी जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात. या आगीतून मोठे प्राणी स्वतःची सुटका करून घेतात. मात्र छोटे प्राणी यात होरपळतात. पण, सोमवारच्या आगीत वन्यप्राणांना धोका झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ताडोब्यातील पळसगाव कोअर झोनमध्ये ११ मार्चला वणवा लागला होता. वनविकास महामंडळाच्या आग संरक्षण यंत्रणा पथकाने ताबडतोब आग विझविण्याचे काम केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडीच तास लागले होते. दरम्यान, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आग संरक्षण यंत्रणा सज्ज असून ५५ हजार १६२ हेक्टरवर वनवणवा नियंत्रण ठेवले गेले आहे. वनविकास महामंडळाच्या उत्तर चंद्रपूर विभागामार्फत ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनातील आगीचे संरक्षणाची कामे पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागामार्फत १६ फेब्रुवारी ते १५ जून या कालवधीत केली गेली. यंदाही वनविकास महामंडळामार्फत आधुनिक वनवणवा प्रतिबंधक प्रकल्पांतर्गत आग संरक्षणाची कामे राबविण्यात येत आहेत.