म.टा. प्रतिनिधी, नागपूर
दिवाळीचे दिवस विविध प्रकारच्या फराळाच्या पदार्थांनी सजलेले असतात. चकल्या, चिवडा, शेव, शंकरपाळे, लाडू, करंज्या, चिरोटे असे अनेक खारे आणि गोड पदार्थ घरात डब्बे भरभरून असतात. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजारी सर्वांना बोलावून फराळ फस्त करण्याची मजा लुटली जाते. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर 'फराळाची देवाणघेवाण जपून रे बाबा' म्हणण्याची वेळ आली असून प्रत्येकाने 'जिभेवर नियंत्रण, टळेल संक्रमण' या मंत्राची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
दिवाळी म्हटली की उत्साहाला उधाण आणि फराळाची रेलचेल सर्वत्र दिसून येते. यंदाची दिवाळी याला अपवाद आहे. कारण, या दिवाळीला करोनारूपी महामारीची काळी किनार आहे, जी होत्याचे नव्हते करायला पुरेशी आहे. शहराचा विचार करता संक्रमणाची गती मंदावलेली असली तरीही विनाशकारी दुसऱ्या लाटेचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. अशा स्थितीत एकमेकांकडे जात फराळावर ताव मारण्याचे मनसुबे किमान वर्षभरापुरते टाळलेलेच बरे. फराळातील बहुतांश पदार्थ हे तेलकट, तुपकट असतात. अनारसे, चिवडा, चकली, शेव यामुळे कफ वाढण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या वस्तूंचे सेवन करून संक्रमणाला आमंत्रण देऊ नका. तसेही 'जान है तो जहाँ है' असे जुनेजाणते सांगून गेलेच आहेत.
आरोग्याचा दिवा तेवत ठेवा
करोनामुळे इतरांकडे जाऊन फराळ चाखण्याची संधी दवडणार असली तरी आपापल्या घरी केलेला फराळ खाण्याचे बंधन कुणावरही नाही. गरज आहे ती थोडी फार काळजी घेण्याची. फराळ करताना वरचेवर कोमट पाणी प्यायला हवे. पित्तप्रकृती, वातप्रकृती असलेल्या व्यक्ती आणि मधुमेहग्रस्तांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फराळ करावा. दुकानातील मिठाई आणि चॉकलेटचा अतिरेक टाळायला हवा. करोनाचा राक्षस आ वासून बसलाय. त्यामुळे दिवाळीत फराळ करताना अधिक काळजी घ्या आणि घरोघरी आरोग्याचा दिवा तेवत ठेवा.
दिवाळीचे दिवस विविध प्रकारच्या फराळाच्या पदार्थांनी सजलेले असतात. चकल्या, चिवडा, शेव, शंकरपाळे, लाडू, करंज्या, चिरोटे असे अनेक खारे आणि गोड पदार्थ घरात डब्बे भरभरून असतात. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजारी सर्वांना बोलावून फराळ फस्त करण्याची मजा लुटली जाते. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर 'फराळाची देवाणघेवाण जपून रे बाबा' म्हणण्याची वेळ आली असून प्रत्येकाने 'जिभेवर नियंत्रण, टळेल संक्रमण' या मंत्राची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
दिवाळी म्हटली की उत्साहाला उधाण आणि फराळाची रेलचेल सर्वत्र दिसून येते. यंदाची दिवाळी याला अपवाद आहे. कारण, या दिवाळीला करोनारूपी महामारीची काळी किनार आहे, जी होत्याचे नव्हते करायला पुरेशी आहे. शहराचा विचार करता संक्रमणाची गती मंदावलेली असली तरीही विनाशकारी दुसऱ्या लाटेचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. अशा स्थितीत एकमेकांकडे जात फराळावर ताव मारण्याचे मनसुबे किमान वर्षभरापुरते टाळलेलेच बरे. फराळातील बहुतांश पदार्थ हे तेलकट, तुपकट असतात. अनारसे, चिवडा, चकली, शेव यामुळे कफ वाढण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या वस्तूंचे सेवन करून संक्रमणाला आमंत्रण देऊ नका. तसेही 'जान है तो जहाँ है' असे जुनेजाणते सांगून गेलेच आहेत.
आरोग्याचा दिवा तेवत ठेवा
करोनामुळे इतरांकडे जाऊन फराळ चाखण्याची संधी दवडणार असली तरी आपापल्या घरी केलेला फराळ खाण्याचे बंधन कुणावरही नाही. गरज आहे ती थोडी फार काळजी घेण्याची. फराळ करताना वरचेवर कोमट पाणी प्यायला हवे. पित्तप्रकृती, वातप्रकृती असलेल्या व्यक्ती आणि मधुमेहग्रस्तांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फराळ करावा. दुकानातील मिठाई आणि चॉकलेटचा अतिरेक टाळायला हवा. करोनाचा राक्षस आ वासून बसलाय. त्यामुळे दिवाळीत फराळ करताना अधिक काळजी घ्या आणि घरोघरी आरोग्याचा दिवा तेवत ठेवा.