अ‍ॅपशहर

जयच्या शिकारीचे दावे नकोत; पुरावे द्या!

गेले अनेक दिवस ‘जय’ च्या मुद्द्यावर आश्चर्यकारक मौन धारण करून बसलेल्या राज्याच्या वनविभागाने या विषयावर अखेर मंगळवारी आपले मत व्यक्त केले. जयच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर म‌ाहिती कुणाकडेच उपलब्ध झाली नसून, त्याच्या शिकारीचे दावे करणाऱ्यांनी त्याबाबतचे पुरावे सादर करावेत, असे प्रतिआव्हानच वनविभागाने दिले आहे.

Maharashtra Times 24 Aug 2016, 4:21 am
नागपूर : गेले अनेक दिवस ‘जय’ च्या मुद्द्यावर आश्चर्यकारक मौन धारण करून बसलेल्या राज्याच्या वनविभागाने या विषयावर अखेर मंगळवारी आपले मत व्यक्त केले. जयच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर म‌ाहिती कुणाकडेच उपलब्ध झाली नसून, त्याच्या शिकारीचे दावे करणाऱ्यांनी त्याबाबतचे पुरावे सादर करावेत, असे प्रतिआव्हानच वनविभागाने दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम forest asks about proof regarding tiger poatching
जयच्या शिकारीचे दावे नकोत; पुरावे द्या!


जयची शिकार झाल्याचे किंवा त्याला बघितल्याचे दावेही अनेकांनी केले आहेत. गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी तर पत्रकार परिषद घेऊन जयची श‌िकारच झाल्याचा दावा केला होते. वन विभागाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

बरे किंवा वाईट, म‌ाहिती देऊ!

मान्सून काळात पाणी आणि शिकारीच्या शोधात किंवा इतर जैविक गरजांसाठी अधिक घनदाट जंगलात जय निघून गेला असण्याची शक्यता आहे. वनविभागाची पथके अद्यापही जयच्या शोधात आहेत. जयच्या बाबतीत बरी किंवा वाईट जी कुठली खात्रीलायक बातमी मिळेल, ती माहिती खात्रीपूर्वक लोकांपर्यंत पोहोचविली जाईल, असे वन्य जीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज