म.टा. प्रतिनिधी, नागपूर
जिने जन्म दिला ती जन्मदात्री आणि जिला जन्म दिला तो काळजाचा तुकडा असलेली लाडकी मुलगी दोघीही अचानक एका अमानवीय क्रूरतेच्या बळी ठरल्या. हातात दीड वर्षाच्या चिमुकलीचे पार्थिव आणि मागाहून येणारे आईचे पार्थिव अशा परिस्थितीत रविकांत कांबळे सोमवारी दुपारी दिघोरी दहनघाटावर पोहोचले. पोटच्या पोरीला निरोप देण्यासाठी रूपाली कांबळे मैत्रिणींच्या आधारासह कशाबशा चालत होत्या खऱ्या, पण 'राशी' गेली आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. ए राशी, उठ ना गं... आई, माझ्या मुलीकडे बघा हो... तुम्हीही उठा हो', असा आक्रोश रूपाली करत होत्या. रोज कितीतरी पार्थिव आपल्या उदरात भस्मसात करवून घेणाऱ्या दिघोरी घाटाच्या काळजाला हा आक्रोश पाझर फोडत होता.
पत्रकार रविकांत कांबळे यांची आई व दीडवर्षीय चिमुकल्या मुलीचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना रविवारी उघडकीस आली. उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. सोमवारी दुपारी उषा सेवकदास कांबळे (वय ५४) व राशी ऊर्फ अपेक्षा रविकांत कांबळे (वय दीड वर्षे, दोन्ही रा. पवनपुत्रनगर, अम्माच्या दर्ग्याजवळ) या दोघींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील विविध वृत्तसंस्थांमधील पत्रकार, पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच अनेक आप्त कांबळे कुटुंबीयांना सांत्वना देण्याकरिता घाटावर उपस्थित होते. दरम्यान, आरोपी गणेश रामबरण शाहू (२६, रा. पवनपुत्रनगर) याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गणेश द्यायचा राशीला चॉकलेट
राशी आणि तिची बहीण खुशी या अनेकदा आजी किंवा त्यांच्या वडिलांसोबत गणेशच्या किराणा दुकानात जात असत. गणेश अनेकदा राशी आणि खुशीला डब्यातील चॉकलेट काढून देत असे. इतके कौटुंबिक संबंध असताना गणेशने इतक्या निर्दयतेने या दोघांची हत्या केल्याने कांबळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
गणेशचे साथीदार कोण?
उषा यांचे वजन किमान ८० किलो असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा मृतदेह पोत्यात भरणे आणि पहिल्या माळ्यावरून तो खाली उतरवून गाडीत टाकणे, हे एकट्याचे काम नाही. त्यामुळे पुरावा नष्ट करताना गणेशला इतर काही जणांनी मदत केल्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी गणेशच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमांतर्गतसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चलो, ब्याज के साथ देता...
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीसुद्धा गणेशचा उषा यांच्याशी वाद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शनिवारी सायंकाळी त्या गणेशच्या शिव किराणा स्टोअर्स येथे गेल्या. येथे त्यांनी गणेशला भिसीचे पैसे मागितले. त्यावरून परत गणेश व उषा यांच्यात वाद झाला. 'तुम को ब्याज के साथ पैसे देता, चलो उपर', असे म्हणून गणेशने उषा यांना पहिल्या माळ्यावरील खोलीत नेले व या दोघींची हत्या केली. त्यामुळे उषा यांची हत्या करणाच्या मानसिकतेतच त्याने या दोघींना वरती नेले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे ही हत्या 'कोल्ड ब्लडेड' असल्याचा संशय बळावू लागला आहे. गणेशच्या घरी बांधकाम सुरू आहे. या बांधकामातील साहित्यातील टीनाचा एक पत्रा त्याने आणला. या पत्राने त्याने या दोघींचा गळा चिरल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसही धक्क्यात
खुनाच्या घटना पोलिसांकरिता तशा नव्या नाहीत. अशा घटनांचा तपास करणे, आरोपीला अटक करणे, मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठविणे, तो नातेवाइकांच्या हवाली करताना योग्य ती कागदोपत्री प्रक्रिया करणे, ही सगळी भीषणता जणूकाही त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग बनतो. अत्यंत शांत डोक्याने आणि नित्यनेमाने ते ही प्रक्रिया पार पाडत असतात. परंतु, राशी आणि तिची आजी उषा यांच्याबाबतीत तसे नव्हते. या दोघी पोलिस कुटुंबातील होत्या. रूपाली कांबळे स्वत: पोलिस कर्मचारी असून, त्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्काराला शहरातील अनेक पोलिस अधिकारीसुद्धा हजर होते.
आम्हालाही मुलंबाळं आहेत हो...
'अहो सर, आम्हालाही मुलंबाळं आहेत हो, त्यांना साध खरचटलं तरी रात्रभर झोप लागत नाही. रूपाली यांचं दु:ख तर कधीही न भरून निघणारं आहे. पोलिस म्हणून आम्ही नेहमीच अशा घटनांना सामोरे जातो, पण आज आमच्यापैकीच एकाच्या नशिबी हे दु:ख येईल, याची कल्पना नव्हती', अशा भावना अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविल्या. नेहमी मृतांच्या नातेवाइकांना धीर देणारी खाकी आज गहिरवली. 'दोन दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातात गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांची कन्या निशाचाही अपघातात मृत्यू झाला. या घटनेतून आम्ही सावरलो नाही तोच ही घटना घडली. हे आघात सहन तरी कसे करायचे', अशी भावना एका अधिकाऱ्याने बोलून दाखविली.
जिने जन्म दिला ती जन्मदात्री आणि जिला जन्म दिला तो काळजाचा तुकडा असलेली लाडकी मुलगी दोघीही अचानक एका अमानवीय क्रूरतेच्या बळी ठरल्या. हातात दीड वर्षाच्या चिमुकलीचे पार्थिव आणि मागाहून येणारे आईचे पार्थिव अशा परिस्थितीत रविकांत कांबळे सोमवारी दुपारी दिघोरी दहनघाटावर पोहोचले. पोटच्या पोरीला निरोप देण्यासाठी रूपाली कांबळे मैत्रिणींच्या आधारासह कशाबशा चालत होत्या खऱ्या, पण 'राशी' गेली आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. ए राशी, उठ ना गं... आई, माझ्या मुलीकडे बघा हो... तुम्हीही उठा हो', असा आक्रोश रूपाली करत होत्या. रोज कितीतरी पार्थिव आपल्या उदरात भस्मसात करवून घेणाऱ्या दिघोरी घाटाच्या काळजाला हा आक्रोश पाझर फोडत होता.
पत्रकार रविकांत कांबळे यांची आई व दीडवर्षीय चिमुकल्या मुलीचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना रविवारी उघडकीस आली. उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. सोमवारी दुपारी उषा सेवकदास कांबळे (वय ५४) व राशी ऊर्फ अपेक्षा रविकांत कांबळे (वय दीड वर्षे, दोन्ही रा. पवनपुत्रनगर, अम्माच्या दर्ग्याजवळ) या दोघींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील विविध वृत्तसंस्थांमधील पत्रकार, पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच अनेक आप्त कांबळे कुटुंबीयांना सांत्वना देण्याकरिता घाटावर उपस्थित होते. दरम्यान, आरोपी गणेश रामबरण शाहू (२६, रा. पवनपुत्रनगर) याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गणेश द्यायचा राशीला चॉकलेट
राशी आणि तिची बहीण खुशी या अनेकदा आजी किंवा त्यांच्या वडिलांसोबत गणेशच्या किराणा दुकानात जात असत. गणेश अनेकदा राशी आणि खुशीला डब्यातील चॉकलेट काढून देत असे. इतके कौटुंबिक संबंध असताना गणेशने इतक्या निर्दयतेने या दोघांची हत्या केल्याने कांबळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
गणेशचे साथीदार कोण?
उषा यांचे वजन किमान ८० किलो असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा मृतदेह पोत्यात भरणे आणि पहिल्या माळ्यावरून तो खाली उतरवून गाडीत टाकणे, हे एकट्याचे काम नाही. त्यामुळे पुरावा नष्ट करताना गणेशला इतर काही जणांनी मदत केल्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी गणेशच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमांतर्गतसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चलो, ब्याज के साथ देता...
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीसुद्धा गणेशचा उषा यांच्याशी वाद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शनिवारी सायंकाळी त्या गणेशच्या शिव किराणा स्टोअर्स येथे गेल्या. येथे त्यांनी गणेशला भिसीचे पैसे मागितले. त्यावरून परत गणेश व उषा यांच्यात वाद झाला. 'तुम को ब्याज के साथ पैसे देता, चलो उपर', असे म्हणून गणेशने उषा यांना पहिल्या माळ्यावरील खोलीत नेले व या दोघींची हत्या केली. त्यामुळे उषा यांची हत्या करणाच्या मानसिकतेतच त्याने या दोघींना वरती नेले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे ही हत्या 'कोल्ड ब्लडेड' असल्याचा संशय बळावू लागला आहे. गणेशच्या घरी बांधकाम सुरू आहे. या बांधकामातील साहित्यातील टीनाचा एक पत्रा त्याने आणला. या पत्राने त्याने या दोघींचा गळा चिरल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसही धक्क्यात
खुनाच्या घटना पोलिसांकरिता तशा नव्या नाहीत. अशा घटनांचा तपास करणे, आरोपीला अटक करणे, मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठविणे, तो नातेवाइकांच्या हवाली करताना योग्य ती कागदोपत्री प्रक्रिया करणे, ही सगळी भीषणता जणूकाही त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग बनतो. अत्यंत शांत डोक्याने आणि नित्यनेमाने ते ही प्रक्रिया पार पाडत असतात. परंतु, राशी आणि तिची आजी उषा यांच्याबाबतीत तसे नव्हते. या दोघी पोलिस कुटुंबातील होत्या. रूपाली कांबळे स्वत: पोलिस कर्मचारी असून, त्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्काराला शहरातील अनेक पोलिस अधिकारीसुद्धा हजर होते.
आम्हालाही मुलंबाळं आहेत हो...
'अहो सर, आम्हालाही मुलंबाळं आहेत हो, त्यांना साध खरचटलं तरी रात्रभर झोप लागत नाही. रूपाली यांचं दु:ख तर कधीही न भरून निघणारं आहे. पोलिस म्हणून आम्ही नेहमीच अशा घटनांना सामोरे जातो, पण आज आमच्यापैकीच एकाच्या नशिबी हे दु:ख येईल, याची कल्पना नव्हती', अशा भावना अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविल्या. नेहमी मृतांच्या नातेवाइकांना धीर देणारी खाकी आज गहिरवली. 'दोन दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातात गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांची कन्या निशाचाही अपघातात मृत्यू झाला. या घटनेतून आम्ही सावरलो नाही तोच ही घटना घडली. हे आघात सहन तरी कसे करायचे', अशी भावना एका अधिकाऱ्याने बोलून दाखविली.