अ‍ॅपशहर

​ स्थायी समाज निर्मितीसाठी...

गांधींनी जागतिक स्तरावर मानवी मूल्य आणि अहिंसा, सत्य व सत्याग्रह या शस्त्रांचा वापर केला. सामान्यातील सामान्य माणसाला जोडले. त्यामुळेच त्यांच्या कार्याला जगमान्यता मिळाली, असे मत हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त गिरीराज किशोर यांनी व्यक्त केले. ‘गांधी-१५०’ अभियानाला प्रारंभ झाला. स्थायी समाज निर्मितीसाठीचे एक पाऊल टाकण्यात आले.

Maharashtra Times 22 Feb 2017, 4:00 am
सेवाग्राम येथे ‘गांधी-१५०’चे उद्‍घाटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gandhi 150 inaguration in sewagram
​ स्थायी समाज निर्मितीसाठी...

म. टा. वृत्तसेवा, वर्धा

गांधींनी जागतिक स्तरावर मानवी मूल्य आणि अहिंसा, सत्य व सत्याग्रह या शस्त्रांचा वापर केला. सामान्यातील सामान्य माणसाला जोडले. त्यामुळेच त्यांच्या कार्याला जगमान्यता मिळाली, असे मत हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त गिरीराज किशोर यांनी व्यक्त केले. ‘गांधी-१५०’ अभियानाला प्रारंभ झाला. स्थायी समाज निर्मितीसाठीचे एक पाऊल टाकण्यात आले.

महात्मा गांधी यांच्या जन्माला २०१९मध्ये दीडशे वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त गांधी विचारांशी नाते सांगणाऱ्या अनेक संस्था, संघटनांच्यावतीने ‘गांधी-१५०’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीच्या नई तालीम परिसरात या अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, साबरमती आश्रमाचे अमृतभाई मोदी, सुब्बाराव, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांची उपस्थिती होती. ‘स्थायी समाज निर्मितीसाठी गांधींकडे एक पाऊल’ ही या अभियानाची संकल्पना आहे. साबरमतीचे अमृतभाई म्हणाले, गांधींच्या शताब्दी आणि दीडशेव्या जयंतीचा मी प्रतिनिधी आहे. गांधी आजही तितकेच सार्थक वाटतात. म्हणून त्यांच्याबाबत लिहिलेल्या सर्व साहित्याचे संग्रहण करण्यात येत आहे. गांधी राहिलेल्या स्थळांचेही जतन करण्यात येत आहे. कारण ते अधिक प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात हिराभाई यांनी गायलेल्या ‘हे प्रभो सून लो हमारी प्रार्थना’ या भजनाने झाली. सुब्बाराव यांनी ‘जय जगत... जय जगत...’ हे गीत सादर केले. त्यानंतर ‘रचनात्मक कार्य’, ‘आंदोलन व संघर्ष’, ‘कला आणि माध्यमे’, ‘युवा आणि दिशा’ या चार विषयावर चर्चा करण्यात आली. देशातील विविध कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थागत कार्यकर्ते, आंदोलनाचे

प्रतिनिधी असे सुमारे २४० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. प्रस्तावना डॉ. सुगन बरंठ यांनी केली. संचालन भरत महोदय यांनी केले.


आज विशेष व्याख्याने
आज, बुधवारी गटचर्चेत झालेल्या विषयावरील सार मांडण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या सूचना तसेच गांधी-१५० कार्यक्रमाची घोषणा करण्यात येईल. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांचे ‘एक गैर गांधीवादी आकलन’ यावर व्याख्यान होणार आहे. ‘युवा परिप्रेक्ष्य’, ‘गांधी -१५०वर महिलांचे विचार’ आदी विषयांवर व्याख्यान होणार आहे .

अपप्रचार सीमा ओलांडतोय

गांधीजींवर अनेक नाटके लिहिली गेली आहेत. प्रत्येक दहा वर्षात ही नाटके लिहिली जात आहेत. काहींतून गांधींवर टीका होते तर काहींमध्ये गांधी दाखविले जातात. पण, तरीही लोकांना खरे गांधी कळत नाही. युवा पिढीने गांधी समजून घेतला तर ही पिढी सत्य, अहिंसेच्या मार्गावर देशाला एका उंच शिखरावर पोहचवू शकते. महात्मा गांधींविरुद्ध सुरू असलेला अपप्रचार सीमा ओलांडतो आहे. तो थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मत विश्वंभर चौधरी यांनी मांडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज