म.टा. प्रतिनिधी, नागपूरः अवघ्या दीनांचा नाथ असलेल्या सुखकर्ता गणरायाचे आगमन झाले असून चिमुकल्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. बाप्पाच्या तयारीसाठी मागील महिनाभरापासून सुरू असलेली धावपळ जणू काही फळाला आलेली आहे. पुढील दहा दिवस हा आनंदसोहळा घरोघरी रंगणार असून वर्षभर पुरेल इतका आनंद, उत्साह, चैतन्य आणि सद्गुणांचा वर्षाव सर्वांवर होऊ दे, अशी प्रार्थना बाप्पाकडे करण्यात येणार आहे.
विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे विश्वव्यापीच. प्रत्येकाला तो भुरळ घालतो. आकारापासून ते विविध रंगसंगतीतील रूपांपर्यंत तो साऱ्यांनाच मोहवून टाकतो. गणेशोत्सवाचे दहा-अकरा दिवस संपूर्ण घर मांगल्यमय होऊन जाते. पहाटे उठून फुले तोडणे, दुर्वाच्या जुड्या बनविणे, दररोज सकाळ-सायंकाळ ठराविक वेळेवर होणारी आरती आणि त्यानंतर मुखातून आपसूक निघणारा 'गणपती बाप्पा मोरया...'चा जल्लोष वातावरण प्रफुल्लित करून जातो. आजपासून दहा दिवस भक्तिरसात मंतरलेले वातावरण भाविकांना अनुभवता येणार आहे. विशेषत: बच्चेकंपनी बाप्पाच्या आगमनाने भलतीच खूश झालेली आहे. घरांमध्ये आनंदरूपी लहानगे उंदीर उड्या मारतानाचे दृश्य आता काही दिवस डोळ्यांना सुखावणार आहे. छोटे उस्तादांच्या या उत्साहाला समर्पक असा 'ए आई, देवबाप्पा आले...' अशी हाक देणारा छोटासा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.
मेट्रोच्या कामाचा फटका
सेंट्रल एव्हेन्यूवर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर वाहने ठेवण्यास यंदा पोलिसांनी बंदी घातली. त्यामुळे गणेशभक्तांना चितारओळीपासून सुमारे अर्धा कि.मी. दूर वाहने ठेवावी लागली. मोठ्या मूर्ती नेण्यासाठी चांगलीच अडचण झाली. वाजतगाजत सुरू असलेल्या मिरवणुकांचे चित्र शहराच्या सर्वच भागात दिसून आले. पाऊस सुरू झाला असताना गणपतीच्या मूर्तीवर प्लास्टिक झाकून 'मंगलमूर्ती मोरया' असा जयघोष करीत कोणी कारमध्ये तर कोणी मोठ्या वाहनांमध्ये मूर्ती घेऊन जात होते.
रुद्र अवतारावरून तणाव
रुद्र गणेश उत्सव मंडळाने गंगा प्रदूषणच्या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला आहे. यामध्ये गंगा नदीत झालेले जलप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी साक्षात रुद्र अवतारातील गणराय पृथ्वीवर अवतरित झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मंडळाच्या या देखाव्यावर बजरंग दलने आक्षेप नोंदविला. त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, पंजू तोतवानी आणि इतर समाजबांधवांनी पोलिसांच्या सहकार्याने वाद शमविण्यात आला.
विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे विश्वव्यापीच. प्रत्येकाला तो भुरळ घालतो. आकारापासून ते विविध रंगसंगतीतील रूपांपर्यंत तो साऱ्यांनाच मोहवून टाकतो. गणेशोत्सवाचे दहा-अकरा दिवस संपूर्ण घर मांगल्यमय होऊन जाते. पहाटे उठून फुले तोडणे, दुर्वाच्या जुड्या बनविणे, दररोज सकाळ-सायंकाळ ठराविक वेळेवर होणारी आरती आणि त्यानंतर मुखातून आपसूक निघणारा 'गणपती बाप्पा मोरया...'चा जल्लोष वातावरण प्रफुल्लित करून जातो. आजपासून दहा दिवस भक्तिरसात मंतरलेले वातावरण भाविकांना अनुभवता येणार आहे. विशेषत: बच्चेकंपनी बाप्पाच्या आगमनाने भलतीच खूश झालेली आहे. घरांमध्ये आनंदरूपी लहानगे उंदीर उड्या मारतानाचे दृश्य आता काही दिवस डोळ्यांना सुखावणार आहे. छोटे उस्तादांच्या या उत्साहाला समर्पक असा 'ए आई, देवबाप्पा आले...' अशी हाक देणारा छोटासा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.
मेट्रोच्या कामाचा फटका
सेंट्रल एव्हेन्यूवर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर वाहने ठेवण्यास यंदा पोलिसांनी बंदी घातली. त्यामुळे गणेशभक्तांना चितारओळीपासून सुमारे अर्धा कि.मी. दूर वाहने ठेवावी लागली. मोठ्या मूर्ती नेण्यासाठी चांगलीच अडचण झाली. वाजतगाजत सुरू असलेल्या मिरवणुकांचे चित्र शहराच्या सर्वच भागात दिसून आले. पाऊस सुरू झाला असताना गणपतीच्या मूर्तीवर प्लास्टिक झाकून 'मंगलमूर्ती मोरया' असा जयघोष करीत कोणी कारमध्ये तर कोणी मोठ्या वाहनांमध्ये मूर्ती घेऊन जात होते.
रुद्र अवतारावरून तणाव
रुद्र गणेश उत्सव मंडळाने गंगा प्रदूषणच्या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला आहे. यामध्ये गंगा नदीत झालेले जलप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी साक्षात रुद्र अवतारातील गणराय पृथ्वीवर अवतरित झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मंडळाच्या या देखाव्यावर बजरंग दलने आक्षेप नोंदविला. त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, पंजू तोतवानी आणि इतर समाजबांधवांनी पोलिसांच्या सहकार्याने वाद शमविण्यात आला.