म.टा. प्रतिनिधी, गोंदिया
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात ऑक्सिजनमुळे ६२ मुलांच्या झालेल्या मृत्यूंमुळे देशभरात हाहाकार माजलेला असतानाच गोंदिया व बालाघाट जिल्ह्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी शक्यता मध्य प्रदेशातील लांजीचे माजी आमदार बसप नेते किशोर समरिते यांनी व्यक्त केली आहे. गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील काही रुग्णालयांसह खासगी व्यवसायिकांना लिक्विड ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्याचे काम गोंदियातील श्याम इंटरप्रायजेस या कंपनीकडे आहे. वास्तविक या कंपनीत ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्यासोबतच रिफिलींगसाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारीवर्ग कायद्यानुसार नाही, अशी माहिती समरिते यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
गोंदिया येथील श्याम इंटरप्रायजेस या कंपनीमध्ये प्रशिक्षित व रासायनिक पदार्थांचे ज्ञान असलेल्या व्यक्ती कार्यरत नसल्याचे माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीमध्ये उघडकीस आले आहे. त्यातील माहितीनुसार, नरेश शाहू नामक व्यक्ती हे गोंदियाच्या श्याम इंटरप्रायजेसमध्ये नोकरी न करता छतीसगड राज्यातील भिलाई येथील अतुल ऑक्सिजन प्रा. लि. कंपनीत नोकरीवर आहे. त्या व्यक्तीच्या कागदपत्राच्या आधारावर गोंदियात ऑक्सिजन रिफिलिंगचे काम केले जात आहे. हा प्रकार अवैध असल्याचे समरिते यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजन सिलिंडरमध्ये रिफिलिंग करताना कुठले केमीकल टाकले जातात. याबद्दल शंका असून आजपर्यंत गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्यात ५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. प्रशिक्षित व्यक्तीच कारखान्यात नसेल तर रिफिलिंग केलेले सिलिंडर योग्य गुणवत्तेचा आहे, हे कसे मानायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. याप्रकरणात आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासोबतच, केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यानी सांगितले.
समरिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम इंटरप्रायजेस कवलेवाडा रोड, फूलचूर (गोंदिया)च्या वतीने जानेवारी २०१७ पासूनच गोंदियासह बालाघाट येथे लिक्विड ऑक्सिजनचा सिलिंडर पुरवठा सुरू आहे. मात्र, या कंपनीला अन्न औषध पुरवठा विभागाच्यावतीने २९ मे २०१७ ला अधिकृत परवाना देण्यात आला आहे. ज्या नरेश शाहूला तांत्रिक कर्मचारी कागदोपत्री दाखवून परवाना घेतला, त्यानंतर या संयत्राचे काम श्याम इंटरप्रायजेसचे संचालक अग्रवाल यांच्याच कुटुबांतील एका अप्रशिक्षित व्यक्तीला राईस इंडस्ट्रीचा १० वर्षाचा अनुभव दाखवित ठेवण्यात आले. विशेष म्हणजे हे राइस मिल गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचीही माहिती समरितेनी दिली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात ऑक्सिजनमुळे ६२ मुलांच्या झालेल्या मृत्यूंमुळे देशभरात हाहाकार माजलेला असतानाच गोंदिया व बालाघाट जिल्ह्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी शक्यता मध्य प्रदेशातील लांजीचे माजी आमदार बसप नेते किशोर समरिते यांनी व्यक्त केली आहे. गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील काही रुग्णालयांसह खासगी व्यवसायिकांना लिक्विड ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्याचे काम गोंदियातील श्याम इंटरप्रायजेस या कंपनीकडे आहे. वास्तविक या कंपनीत ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्यासोबतच रिफिलींगसाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारीवर्ग कायद्यानुसार नाही, अशी माहिती समरिते यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
गोंदिया येथील श्याम इंटरप्रायजेस या कंपनीमध्ये प्रशिक्षित व रासायनिक पदार्थांचे ज्ञान असलेल्या व्यक्ती कार्यरत नसल्याचे माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीमध्ये उघडकीस आले आहे. त्यातील माहितीनुसार, नरेश शाहू नामक व्यक्ती हे गोंदियाच्या श्याम इंटरप्रायजेसमध्ये नोकरी न करता छतीसगड राज्यातील भिलाई येथील अतुल ऑक्सिजन प्रा. लि. कंपनीत नोकरीवर आहे. त्या व्यक्तीच्या कागदपत्राच्या आधारावर गोंदियात ऑक्सिजन रिफिलिंगचे काम केले जात आहे. हा प्रकार अवैध असल्याचे समरिते यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजन सिलिंडरमध्ये रिफिलिंग करताना कुठले केमीकल टाकले जातात. याबद्दल शंका असून आजपर्यंत गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्यात ५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. प्रशिक्षित व्यक्तीच कारखान्यात नसेल तर रिफिलिंग केलेले सिलिंडर योग्य गुणवत्तेचा आहे, हे कसे मानायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. याप्रकरणात आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासोबतच, केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यानी सांगितले.
समरिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम इंटरप्रायजेस कवलेवाडा रोड, फूलचूर (गोंदिया)च्या वतीने जानेवारी २०१७ पासूनच गोंदियासह बालाघाट येथे लिक्विड ऑक्सिजनचा सिलिंडर पुरवठा सुरू आहे. मात्र, या कंपनीला अन्न औषध पुरवठा विभागाच्यावतीने २९ मे २०१७ ला अधिकृत परवाना देण्यात आला आहे. ज्या नरेश शाहूला तांत्रिक कर्मचारी कागदोपत्री दाखवून परवाना घेतला, त्यानंतर या संयत्राचे काम श्याम इंटरप्रायजेसचे संचालक अग्रवाल यांच्याच कुटुबांतील एका अप्रशिक्षित व्यक्तीला राईस इंडस्ट्रीचा १० वर्षाचा अनुभव दाखवित ठेवण्यात आले. विशेष म्हणजे हे राइस मिल गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचीही माहिती समरितेनी दिली.