अ‍ॅपशहर

विदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट

संपूर्ण विदर्भात उष्णतेचा कहर सुरुच आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागपूर, चंद्रपूर आणि अकोला येथे अधिक प्रभाव राहणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 7:07 am
नागपूर : संपूर्ण विदर्भात उष्णतेचा कहर सुरुच आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागपूर, चंद्रपूर आणि अकोला येथे अधिक प्रभाव राहणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच


बुधवारी चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपूर आणि वर्ध्याचे तापमान अनुक्रमे ४६, ४५.५ अंश सेल्सिअस होते. नागपूरचा पारा सहा दिवसांत एकदाही ४५ अंशाच्या खाली गेलेला नाही. आता हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार पुढील दोन दिवस उन्हाचे चटके कायम राहणार आहेत. त्यामुळे 'मे हिट'चा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी ५ घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक असेल तर उन्हात बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण शरीर झाकावे. विशेषत: कान झाकल्या जाईल अशा प्रकारे डोक्याला दुपट्टा, स्कार्फ बांधावा, असे आवाहन प्रादेशिक हवामान विभागातील वैज्ञानिक ब्रजेश कनोजिया यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज