म. टा. वृत्तसेवा, भंडारा
भाजपच्या कार्यप्रणालीमुळे दुखावलेल्या शिवसेनेने यापुढील निवडणुका स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. तसे झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल व भाजप-सेनेला सत्तेतून दूर व्हावे लागेल. भाजप आणि शिवसेनेमधील अंतर दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शिवसेनेची मनधरणी करण्यास यशस्वी होऊ, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी अर्जुनी/मोरगाव येथे आठवले आले होते. त्यानंतर भंडारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१९मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार पुन्हा येणार असल्याचे सांगत आठवले म्हणाले, राज्यात भाजप, सेना व आरपीआय एकत्र लढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या नाराजीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. शिवसेनेला केंद्रामध्ये मंत्रीपद दिल्यास त्यांची नाराजी दूर होऊ शकते. युती होण्यासाठी आपण दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच शिवसेनेची नाराजी दूर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोरेगाव-भीमा येथे घडलेली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. दलित व मराठ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर निश्चित कारवाई होईल. या घटनेनंतर एकत्र आलेल्या विविध संघटनांनी राज्यभरात बंद पाळला. त्याचे श्रेय एकटे डॉ. प्रकाश आंबडेकर यांना जात नाही, अशी टीका करीत त्या बंदमध्ये सर्व आंबेडकरी समाज एकत्र आला होता, असेही आठवले म्हणाले.
स्वतंत्र विदर्भाची मागणी न्यायोचित असून त्यास आपला पाठींबा आहे. राज्यात भाजपचे सरकार असले तरी विदर्भावरील अन्याय दूर झाला नाही. आघाडी सरकारच्या काळात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी भाजपच आघाडीवर होते. विदर्भ राज्य वेगळा झाल्यावरच विदर्भाला न्याय मिळेल. त्यासाठी भाजपने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले.
एसी, एसटी कमिशनला संवैधानिक दर्जा आहे. आता ओबीसी कमिशनलाही संवैधानिक दर्जा देण्याचे बिल लोकसभेच्या मंजुरीनंतर राज्यसभेत आले. परंतु, त्यात त्रुट्या आढळल्याने ते पुन्हा परत पाठविण्यात आले. येत्या अधिवेशनात हा बिल पुन्हा आणला जाईल व ओबीसी कमिशनला संवैधानिक दर्जा देण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले.
भाजपच्या कार्यप्रणालीमुळे दुखावलेल्या शिवसेनेने यापुढील निवडणुका स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. तसे झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल व भाजप-सेनेला सत्तेतून दूर व्हावे लागेल. भाजप आणि शिवसेनेमधील अंतर दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शिवसेनेची मनधरणी करण्यास यशस्वी होऊ, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी अर्जुनी/मोरगाव येथे आठवले आले होते. त्यानंतर भंडारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१९मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार पुन्हा येणार असल्याचे सांगत आठवले म्हणाले, राज्यात भाजप, सेना व आरपीआय एकत्र लढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या नाराजीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. शिवसेनेला केंद्रामध्ये मंत्रीपद दिल्यास त्यांची नाराजी दूर होऊ शकते. युती होण्यासाठी आपण दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच शिवसेनेची नाराजी दूर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोरेगाव-भीमा येथे घडलेली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. दलित व मराठ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर निश्चित कारवाई होईल. या घटनेनंतर एकत्र आलेल्या विविध संघटनांनी राज्यभरात बंद पाळला. त्याचे श्रेय एकटे डॉ. प्रकाश आंबडेकर यांना जात नाही, अशी टीका करीत त्या बंदमध्ये सर्व आंबेडकरी समाज एकत्र आला होता, असेही आठवले म्हणाले.
स्वतंत्र विदर्भाची मागणी न्यायोचित असून त्यास आपला पाठींबा आहे. राज्यात भाजपचे सरकार असले तरी विदर्भावरील अन्याय दूर झाला नाही. आघाडी सरकारच्या काळात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी भाजपच आघाडीवर होते. विदर्भ राज्य वेगळा झाल्यावरच विदर्भाला न्याय मिळेल. त्यासाठी भाजपने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले.
एसी, एसटी कमिशनला संवैधानिक दर्जा आहे. आता ओबीसी कमिशनलाही संवैधानिक दर्जा देण्याचे बिल लोकसभेच्या मंजुरीनंतर राज्यसभेत आले. परंतु, त्यात त्रुट्या आढळल्याने ते पुन्हा परत पाठविण्यात आले. येत्या अधिवेशनात हा बिल पुन्हा आणला जाईल व ओबीसी कमिशनला संवैधानिक दर्जा देण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले.