अ‍ॅपशहर

विदर्भात पूरस्थिती; वैनगंगेला पूर, सतर्कतेचा इशारा

मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आज कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरुन बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दोन मिटरने उघडण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 10 Sep 2019, 1:41 pm
मटा वृत्तसेवा/भंडारा : मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आज कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरुन बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दोन मिटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हाधिकाºयांनी पुरस्थितीची पाहणी केली असून वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवराच्या खोºयातही जोरदार अतिवृष्टी होत असल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली होती. परंतु, पुन्हा अतिवृष्टी झाल्याने संजय सरोवराचे १० दरवाजे १.८५ मिटरने उघडण्यात आले. त्यातून ७५,४०० क्युसेक्स क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीला पूर आला आहे. वैनगंगेची धोक्याची पातळी २४५.०० मिटर आहे. आज ही पातळी २४५.३२ मीटरवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत. करचखेडा-सुरेवाडा, सिहोरा-बपेरा, तामसवाडी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर भंडारा शहरानजिकच्या ग्रामसेवक कॉलनीत पुराचे पाणी शिरले आहे. भंडारा येथील स्मशानभूमी मार्गावर पाणी असल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगेच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाल्याने पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे २ मिटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ४,८५,१९२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला

संततधार पाऊस आणि धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना पूर आला आहे. या दोन नद्यांचा संगम बपेरा गावाच्या शेजारी आहे. आंतरराज्यीय पुलावर ५ फुट पाणी असल्याने महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला असून शेकडो प्रवासी सिमावर्ती गावात अडकले आहेत. पुराचे पाणी देवरी गावाचे शिवारात शिरल्याने १०० एकरहून अधिक क्षेत्रातील धानाचे पिक गेल्या ४८ तासापासून पाण्याखाली आहेत. गोंडीटोला, सुकडी नकुल, बपेरा, चुल्हाड, परसवाडा या नद्यांच्या काठावरील गावात हीच स्थिती आहे. बावनथडी नदीचे पाणी संगमनजिक अडल्याने नदीला पूर आला आहे. याच नदीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याला जोडणारा पूल आहे. या पुलावर ५ फुट पाणी आले आल्याने संपूर्ण वाहतूक बंद आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरस्थितीची पाहणी

मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे. कारधा येथील लहान पुलावरून पाणी प्रवाहीत झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुरस्थितीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी पांचाळ, तहसीलदार पोयाम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित बातमी: विदर्भात पूरस्थिती: पूल, घरे, मंदिरे पाण्याखाली

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज